Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकरने ठोस निर्णय घ्यावा, नाहीतर 16 तारखेपासून…; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

सरकरने निर्णय जाहीर केला नाही तर १६ तारखेपासून पाणीत्याग करून आम्ही आंदोलन करू, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांचं मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपोषण सुरु आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2025 | 12:57 PM
सरकरने ठोस निर्णय घ्यावा, नाहीतर 16 तारखेपासून...; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

सरकरने ठोस निर्णय घ्यावा, नाहीतर 16 तारखेपासून...; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : सरकारकडून कर्जमाफीबाबत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. सरकरने निर्णय जाहीर केला नाही तर १६ तारखेपासून पाणीत्याग करून आम्ही आंदोलन करू, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांचं मागील ७ दिवसापासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपोषण सुरु आहे. काल पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत कर्जमाफीबद्दल आश्वासन दिले, तुम्ही उपोषण सोडा अशी विनंती त्यांनी बच्चू कडू यांना केली होती. मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.

शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनाबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन सरकारतर्फे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत लढा सुरु राहील. येत्या ३० जूनला अधिवेशनामध्ये कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, त्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करू असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र सध्या ज्या शेतकऱ्यांकडे जूने कर्ज आहे, आणि सध्याच्या परिस्थितीत हे कर्ज फेडणं त्याला शक्य नाही अशा शेतकऱ्यांच्या मागे पैशासाठी तगादा लावू नये, उलट कर्जमाफी होईपर्यंत या शेतकऱ्यांना नवीन कर्ज सरकारने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, आपल्या अन्नत्याग आंदोलनाला आत्तापर्यंत ५० ते ६० आमदारांनी पाठिंबा दिला. काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, शिंदे गटाचे काही आमदार असो वा मनोज जरांगे पाटील आणि राजू शेट्टी असोत, ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांशी बोलून आपण पुढचा निर्णय जाहीर करू. अन्नत्याग आंदोलन शेवट्पर्यंत नेल्याशिवाय हा बच्चू कडू स्वस्त बसणार नाही, कर्जमाफी झाली नाही तर काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. आज दुपारनंतर ते कार्यकरर्त्यांशी तसेच ज्यांनी ज्यांनी उपोषणाला पाठींबा दिला त्या नेत्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहेत.

Web Title: Bachchu kadu has warned the government about the problems of farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Bachchu Kadu
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Farmers

संबंधित बातम्या

Purandar News: शेतकरी महिलांनी केली राईस मिल कंपनीची पायाभरणी; ‘उमेद’च्या माध्यमातून…
1

Purandar News: शेतकरी महिलांनी केली राईस मिल कंपनीची पायाभरणी; ‘उमेद’च्या माध्यमातून…

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
2

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
3

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
4

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.