
मिरचीचे दर उतरले
मिरचीचा दर सध्या 80 रुपये किलो असून गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दरात घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हॉटेल व्यावसायिक व गृहिणींनी मिरचीची खरेदी वाढवली आहे.
लसूण व गवार दरवाढीने ग्राहक चिंतित
पालेभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी लसूण व गवारने मात्र ग्राहकांचे बजेट बिघडवले आहे. सध्या लसूण 180 रुपये किलो दराने विकला जात असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 40 रुपयांची दरवाढ झाली आहे. तसेच गवार दीडशे रुपये किलो दराने विक्रीला असून गेल्या आठवड्यात गवारीच्या दरात सुमारे 30 रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे.
घरगुती वापरातील भाज्यांचे दर तुलनेने परवडणारे आहेत. कांदा 25 रुपये किलो, बटाटा 30 रुपये किलो, वाटाणा 60 रुपये किलो, वराणा 80 रुपये किलो, कोथिंबीर 15 रुपये पेंडी या दराने विक्री होत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबांचा भाजीपाला खर्च काही प्रमाणात आटोक्यात राहिला आहे.दर कमी असल्याने लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सकाळीच मोठी गर्दी होत आहे. स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने नागरिक खरेदीसाठी उत्साहाने बाजारात येत आहेत. यामुळे भाजी विक्रेत्यांनाही समाधानकारक विक्री होत आहे.
फळभाज्यांचे दर नियंत्रणात
फळभाज्यांच्या बाबतीत बहुतांश भाज्यांचे दर सध्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. भेडी 80 रुपये किलो, दोडका 80 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, कारली 60 रुपये किलो, गाजर 50 रुपये किलो, ढबू 80 रुपये किलो या दराने विक्री होत आहे, पलोंवर तीस रुपये एक नग, शेवगा दहा रुपयाला एक नग, कोबी वीस रुपये नग अशा दराने बाजारात उपलब्ध आहे.
लक्ष्मीपुरी भाजी बाजारपेठ :
दर (रु.)
भाजीचे नवे दर
मेथी- रु 10 प्रति पैडी
मिरची-रु 80प्रति किलो
पोकळा-रु 10 प्रति पेडी
फ्लॉवर-रु 30 प्रति नग
चाकवत- रु 10 प्रति पेडी
शेवगा-रु 10 प्रति नग
कोथिंबीर-रु 15 प्रति पेडी
कोबी-रु 20 प्रति नग
भेंडी- रु 80 प्रति किलो
वाटाणा- रु 60 प्रति किलो
दोडका-रु 80 प्रति किलो
वराणा-रु 80 प्रति किलो
वांगी-रु 60 प्रति किलो
कांदा-रु 25 प्रति किलो
कारली-रु 60 प्रति किलो
बटाटा-रु 30 प्रति किलो
गाजर-रु 50 प्रति किलो
लसूण-रु 180 प्रति किलो असे एकंदरीतच नवे दर लागू झाले आहेत.