Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईसह ठाण्यात बर्ड फ्लूचा वाढला धोका; 4200 पिल्लांच्या मृत्यूमुळे लातूरमध्ये खळबळ

लातूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4,200 पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही पिल्ले पाच ते सहा दिवसांची होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 24, 2025 | 07:31 AM
मुंबईसह ठाण्यात बर्ड फ्लूचा वाढला धोका; 4200 पिल्लांच्या मृत्यूमुळे लातूरमध्ये खळबळ

मुंबईसह ठाण्यात बर्ड फ्लूचा वाढला धोका; 4200 पिल्लांच्या मृत्यूमुळे लातूरमध्ये खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई आणि ठाण्यातील काही भागात त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ठाण्यातील बडा बांगला परिसरातील पोलिस आयुक्त आशुतोष डुबेरे यांच्या अधिकृत निवासस्थानी ठेवलेल्या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर, ठाणे महानगरपालिकेने कोपरी परिसरातील चिकन आणि मटण विक्री करणारी दुकाने 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे, कोकणातील उरणमध्ये प्रकरणे आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

उरणमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर

उरणमधील चिरनेर गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू पसरल्यानंतर आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सुमारे 1000 पक्षी मारले गेले आहेत. एका गावकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये मृत आढळलेल्या देशीकोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. ते नमुने भोपाळमधील प्रयोगशाळेत देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले. अहवालात एव्हीयन इन्फ्लूएंझा (बर्ड फ्लू) ची पुष्टी झाली आहे.

5 ते 6 दिवसांची होती पिल्ले

लातूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4200 पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही पिल्ले पाच ते सहा दिवसांची होती आणि दोन ते तीन दिवसांतच मरून गेली. पोल्ट्री फार्म मालकाने अधिकाऱ्यांना वेळेवर माहिती दिली नाही. प्रशासनाने मृत पिल्लांचे नमुने पुण्यातील राज्य पशु (रोग निदान प्रयोगशाळेत पाठवले आहेत आणि तपास सुरू आहे. यापूर्वी याच जिल्ह्यातील उदगीर शहरात बर्ड फ्लूमुळे 60 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

लातूरमध्ये 4200 पिल्लांचा मृत्यू

राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फॉर्मवरील 4200 पिल्लं अचानक दगावली आहेत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. दोन ते तीन दिवसातच पिल्ल दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरूवातीला काय प्रकार होत आहे, हे मालकाला कळेना, त्यानंतर प्रशासनाने या पिल्लांचे सॅम्पल पुणे येथील प्राण्यांशी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवले आहे.

Web Title: Bird flu risk increases in mumbai and thane nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 07:23 AM

Topics:  

  • Bird Flu News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
4

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.