Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारने वफ्फ विधेयक कायद्यात बदल केल्यानंतर हा आरडाओरड कशाला? भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते यांचा विरोधकांना सवाल

केंद्र सरकारने नुकतेच वफ्फ विधेयक कायद्यात बदल केला आहे. यादरम्यान सिंधुदुर्गातील भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 08, 2025 | 09:47 PM
भाजपा सरकारने वफ्फ विधेयक कायद्यात बदल केल्यानंतर हा आरडाओरड कशाला? भाजपचे मुख्य प्रवक्ते यांचा विरोधकांना सवाल

भाजपा सरकारने वफ्फ विधेयक कायद्यात बदल केल्यानंतर हा आरडाओरड कशाला? भाजपचे मुख्य प्रवक्ते यांचा विरोधकांना सवाल

Follow Us
Close
Follow Us:

वफ्फ बोर्ड कायदा 2013 मध्ये केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार काळात झाला त्यावेळी महाविकास आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी कार्यरत होत्या. विद्यमान विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांक गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे सभागृहात होत्या. हा कायदा बदलत असताना यातील कोणीही सभागृहात त्यावर विरोधी भाष्य केले नाही. त्यामुळेच विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेत सुद्धा सहभाग घेतला नाही, मग त्यावेळी हा कायदा चुकीचा केला होता का? आणि आता केंद्र सरकारने त्या कायद्यात बदल केला व कायदयात नव्याने रुपांतर होत असताना हा आरडाओरड कशाला असा आरोप भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे

सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, राजू राऊळ आदी उपस्थित होते.

Swargate Case: स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या कोठडीसाठी पोलिसांचे प्रयत्न; कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

केंद्र सरकारने नुकतेच वफ्फ विधेयक कायद्यात बदल केला आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत याला मान्यता घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची स्वाक्षरी होऊन त्याचे रूपांतर कायद्यात झाले आहे. 2013 मध्ये हा काँग्रेस सरकारने कायदा केला होता. बारा वर्षांनी या कायद्यात बदल करीत असताना त्यावेळी कायद्याच्या बाजूने असलेले काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आता कायदा बदलत असताना मात्र गप्प होते. त्यांनी चर्चेत सहभाग घेतला नाही. जर २०१३ मध्ये हा कायदा याच मंडळींनी केला होता. तर तो कायदा बदलत असताना किमान त्या चर्चेत भाग घेणे महत्त्वाचे होते. प्रियांका गांधी यांनी तर मतदान सुद्धा केले नाही. यावरून हा कायदा चुकीचा बनविला होता हे स्पष्ट होते, असा आरोप माधव भंडारी यांनी केला.

सोनिया गांधी यांनी तर सभागृहातील चर्चेत सुद्धा भाग घेतला नाही. मात्र सभागृहाच्या बाहेर येऊन त्यांनी बदलण्यात येणाऱ्या विधेयकाला विरोध केला. अल्पसंख्याकांवर अन्याय असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. परंतु अल्पसंख्यांक म्हणजे नेमके कोण ? देशात केवळ मुसलमानच अल्पसंख्यांक नाहीत तर ख्रिश्चन व अन्य समाज सुद्धा अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे हा कायदा बदलल्यानंतर देशातील सर्व समाजातून त्याचे अभिनंदन होत आहे. स्वागत केले जात आहे. वफ्फ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार होता. तो अधिकार वफ्फ बोर्डाला सिद्ध करावा लागत नव्हता. तर ज्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्यात आला त्यांना आपला अधिकार सिद्ध करावा लागत होता. त्यामुळे लाखो एकर जमीन या वफ्फ बोर्डाने ताब्यात घेतल्या. हा बोर्ड सांगेल ती जमीन त्यांची होत होती. त्यामुळेच देशातील सर्व समाजाने विद्यमान सरकारने बदललेल्या कायद्याचे स्वागत केले आहे.

पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसवर दगडफेक अन् महिला प्रवाशाच्या…; साताऱ्यातील धक्कादायक घटना

हिंदूंच्या देवस्थान समित्यांवर नियंत्रण करणारी यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी चर्चा सुरू आहे. मस्जिद, चर्च मध्ये आलेला पैसा केवळ मस्जिद, चर्च याच्यासाठीच वापरता येतो. मात्र, हिंदूंच्या मंदिरात आलेला पैसा अन्यत्र वापरला जातो. त्यामुळे त्यात सुधारणा आणण्याची चर्चा सुरू आहे, असेही यावेळी भंडारी यांनी सांगितले.

Web Title: Bjps ex chief spokesperson madhav bhandari questions the opposition after central government made changes in waqf act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 09:38 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Sindhudurg News Update
  • Waqf Board Amendment Bill

संबंधित बातम्या

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा
1

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा

‘त्यांनी मला शिवी नाही दिली तर मुंबईच्या…’, उद्धव ठाकरेंवर अमित साटम यांचा हल्लाबोल
2

‘त्यांनी मला शिवी नाही दिली तर मुंबईच्या…’, उद्धव ठाकरेंवर अमित साटम यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा
3

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
4

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.