
Chandrapur News: 12 वर्षांचा धक्कादायक घोळ! एकाच आधार क्रमांकामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यात...
Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात
दोघांचे आधार क्रमांक एकच असल्याने कारमोरे यांच्या हक्काची डीबीटीद्वारे मिळणारी शासकीय अनुदानाची रक्कम प्रोत्साहनपर भत्ता, पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधी, विविध प्रोत्साहनपर अनुदाने व अन्य शासकीय लाभांची रक्कम थेट देवगडे यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे कारमोरे यांनी सांगितले. या प्रकाराबाबत संबंधितांना वारंवार माहिती देऊनही रक्कम परत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. (फोटो सौजन्य – AI Created)
तालुक्यातील गदगाव येथील शेतकरी कारेमोरे यांच्या नावाने सर्वे क्रमांक १२५ /१ व ८७ /१ अशा प्रकारे येथेच दोन ठिकाणी शेती आहे. गावातीलच तथा आता नागपूर येथे राहणाऱ्या देवगडे या दोघांचेही आधारकार्ड क्रमांक ४९७३ ७२१२ २७४० आहे. दोघांचेही आधारकार्ड क्रमांक सारखेच असल्यामुळे कारमोरे या शेतकऱ्याला डीबीटीद्वारे प्राप्त होणाऱ्या विविध शासकीय अनुदानाची रक्कम, प्रोत्साहनात्मक रक्कम, प्रधानमंत्री किसान, सन्मान निधी, नमो सन्मान निधी देवगडे यांच्या भारतीय स्टेट बँक येथील खात्यात मागील अनेक वर्षापासून जमा होत आहेत.
शेतीसंबंधी या विविध योजनांचा लाभ का मिळत नाही? याबाबत कारमोरे यांना २०२२ पासून लक्षात आल्यानंतर तहसील कार्यालय, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर संबंधित विभागांकडे अनेकदा निवेदने व तक्रारी सादर केल्या. मात्र, १२ वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
यापूर्वी शंकरपूर येथील एका तरुणाच्या आधार कार्डावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकल्याची घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली होती. मात्र, सामान्य शेतकऱ्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, कोल्हापूर आणि पुण्यात लाखो रुपयांचा औषधसाठा जप्त
प्रशासनाने माझे व जगदीश देवगडे यांचे सारखेच असलेले आधारकार्ड रद्द करावे. कर्ज माफीचेही पैसे, पीएम किसानचेही पैसे त्यांच्याच अकाउंटमध्ये जमा झाले. सुरुवातीला वाटले आमचीच चुकी असावी. माझे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले. थोडे थोडे पैसे देतो म्हणत होता. आता फोनच उचलत नाही. तहसीलदारांनाही दोनदा निवेदन दिले, शासनाच्या तांत्रिक चुकीचा त्रास मला होत आहे. आता कर्ज माफीचा लाभ कसा मिळणार?- सुनील कारमोरे, गदगाव
चिमुरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांना दोनदा फोन केला. मात्र त्यांनी फोनच उचलला नाही व प्रतिसादही दिला नाही.