
Checking squad to prevent any kind of malpractices during 12th exams
Nanded News : नांदेड : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ११० परीक्षा केंद्रांवर एकूण ४२ हजार ८७२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.
परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी कॉपीमुक्तीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ११० बैठी पथके नेमण्यात आली असून ११० केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० परीरक्षक असून १० विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच प्रत्येक तालुक्यावर दोन भरारी पथके, उपविभागीय स्तरावर एक भरारी पथक कार्यरत राहणार आहे.. ही पथके परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी कॉपीमुक्त अभियान राबविण्याबातचे तगडे नियोजन केले आहे. परीक्षा काळात केंद्र संचालक, पर्यवेक्षक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास
गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा दिला इशारा
२० फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीची उच्च माध्यमिक शालांत नमाणपत्र परीक्षा व २० फेब्रुवारीपासून इयत्ता १० वीची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. परीक्षेशी संबंधित काही घटकांच्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे पूर्वी परीक्षा व्यवस्थेला बदनामी सहन करावी ागली आहे. विशिष्ट केंद्रे, काही केंद्रसंचालक व व्यक्तींमुळे संपूर्ण व्यवस्थेवर डाग लागतो, तर अनेकांनी कलेले चांगले काम दुर्लक्षित राहते. त्यामुळे यंदा उत्कृष्ट पद्धतीने परीक्षा संचालन करणाऱ्या केंद्रसंचालकांच्या कार्याची नोंद घेतली जाणार असून गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परीक्षा निर्विघ्न व स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा
परीक्षा पारदर्शकतेसाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज
जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे परीक्षेसाठी कंबर कसली आहे. सर्व केंद्रसंचालकांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी भौतिक सुविधांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे, उपद्रवी व संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही मंत्रणा कार्यान्वित ठेवून चित्रीकरणाची साठवणूक सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पहणार असून विशेष नरारी पथकासह बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहेत, भरारी बथकात जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची तसेच महसूल प्रशासनातील अधिकाऱ्याऱ्यांचा तसेच परिविक्षाधीन आयएस, आयपीएस अधिका-यांचा समावेश आहे, पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांनी बरीक्षेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी माचव सलगर यांनी दिली.