
PICU, Chhatrapati Sambhajinagar, Asian Hospital, Hospital Fire,
आगीची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका दाखल झाल्या. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातील 55 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. नवजात बालकांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी घाटी रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.
WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल
आगीची माहिती समजताच रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि पोलिसांनी समन्वयाने बचावकार्य सुरू केले. विशेष काळजी घेऊन नवजात बालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. वेळेत करण्यात आलेल्या या बचावकार्यामुळे सर्व 9 बालकांना वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले. बचावकार्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सर्व बालके सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
या घटनेनंतर बालकांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
एशियन हॉस्पिटलच्या PICU विभागाला आग नेमकी कशामुळे लागली, आगीमुळे विभागाचे नेमके किती नुकसान झाले, याचीही माहिती समोर आलेली नाही. अग्निसुरक्षा व्यवस्थेची पाहणी तसेच आगीच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, अमरावती येथील सरकारी रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU मध्ये आग लागल्याने रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या आठवड्यात अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.त्यानंतर आगीने वेगाने कक्षाला वेढले आणि तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता संभाजीनगर मध्येही अशी घटना घडल्याने आता फायर ऑडिटची मागणी जोर धरू लागली आहे.
या घटनेनंतर रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता छत्रपती संभाजीनगरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करून अग्निसुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.