
Aditya Thackeray, Uddhav Thackeray, Mission Marathwada,
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत. महायुती सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे, सिंचन प्रकल्प, रोजगार आणि स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत सरकारच्या कामगिरीवरून हल्लाबोल करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ आणि १७ सप्टेंबरला संभाजीनगरात मुक्कामी असणार आहेत. १७ सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत पक्ष संघटना मजबूत करण्यासह कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य करण्याचा प्रयत्न होणार आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत, महायुती सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे, सिंचन प्रकल्प, रोजगार आणि स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत सरकारच्या कामगिरीवरून हल्लाबोल करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ आणि १७सप्टेंबरला संभाजीनगरात मुक्कामी असणार आहेत.
१७ सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत पक्ष संघटना मजबूत करण्यासह कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. दरम्यान, ताकरे गटातून शिंदे सेनेत गेलेले परभणीचे खासदार संजय (बडू) जाधव यांनी रविवारी परभणीत शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले.
या मेळाव्याला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यानी विरोध केला होता, आता जरागे पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसल्याने या आंदोलनाचा राजकीय परिणामही महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर मराठवाड्यातील वर्चस्वासाठी टाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच मराठा आरक्षण, पाणी, शेती, सिंचन, उद्योग आणि रोजगाराचे प्रश्न ऐरणीवर असल्याने आगामी काळात मराठवाडा हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. खासदार संजय (बडू) जाधव यांनी रविवारी परभणीत शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्याला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला होता. आता जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसल्याने या आंदोलनाचा राजकीय परिणामही महत्त्वाचा ठरणार आहे.