Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Crisis : प्रकल्पांची तळाकडे वाटचाल : मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पात अवघा ९.१२ टक्के आणि ७५१ लघु प्रकल्पांत २३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 01, 2025 | 04:11 PM
प्रकल्पांची तळाकडे वाटचाल : मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

प्रकल्पांची तळाकडे वाटचाल : मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

महिनाभरापासून उन्हाचा तडाखा सुरु आहे. एकीकडे नागरिकांना उष्णतेचा त्रास होतो आहे तर दुसरीकडे बाष्पीभवनाचा फटका पडत असल्याने धरणांची पाणीपातळी झपाट्याने खाली येत आहे. सध्या सर्व जिल्ह्यांत तापमान चाळीशीपुढे सरकून ४५ अंशाच्या दिशेने कूच करत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवार, २९ रोजी या हंगामातील विक्रीम ४२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; दमछाक झाली अन्…

पुढील काही दिवसात तीव्र उष्णतेच्या लाटा धडकणार आहेत. वाढते तापमान आणि पाणी टंचाईने नागरिक हवालदिल झाले आहेत. याचा फटका धरणांनाही बसत आहे. जायकवाडीसह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी पाळीपातळी खाली खाली येत आहे. यातील अनेक धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे.

विभागात प्रमुख ११ मोठ्या धरणांमध्ये आजघडीला ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पात अवघा ९.१२ टक्के आणि ७५१ लघु प्रकल्पांत २३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २६.२७ टक्के पाणीसाठा तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ प्रकल्पांमध्ये ८९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील एकूण ८७९ प्रकल्पांमध्ये ३८.८९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या विभागांत तीव्र पाणीटंचाई सुरु झाली आहे.

पिकांसह फळबागा संकटात

पाणी टंचाईमुळे विभागातील फळबागा संकटात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. वाढत्या तापमानामुळे झाडांची पाण्याची गरज वाढली आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे फळबागा जगविण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. शासकीय पातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तंत्रज्ञान आणि पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास कमी पाण्यात फळबागा वाचविण्यास मदत होते, असे हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला; वाशिममध्ये तापमान 43 अंशांवर

प्रकल्पनिहाय उपलब्ध पाणीसाठा

जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पात जेमतेम साठा आहे. सुखना धरणात १० टक्के पाणीसाठा आहे. लाहुकी ३, टेंभापुरी ८२, ढेकू ६, कोल्ही ५२, नारंगी ३३, गिरजा ३०, अंबाडी २४, गडदगड २९, पूर्णा नेवपूर २६, अंजना पळशी ६३, शिवना टाकळी ३२, खेळणा १९ आणि अजिंठा अंधारी १५ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. बोरदहेगाव आणि वाकोद धरण कोरडे आहे. वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यामुळे आतापासूनच मोठी चिंता पडली आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar district has less than 50 percent water storage in dam heatwave impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Dam Water Level
  • Water problem

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे
1

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar: पालकांनी नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने उचललं टोकाचे पाऊल
2

Chhatrapati Sambhajinagar: पालकांनी नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने उचललं टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्या आईकडून अमानवी छळ, चटके दिले, उपाशी ठेवलं……;
3

छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्या आईकडून अमानवी छळ, चटके दिले, उपाशी ठेवलं……;

Sambhajinagar : “हे चरित्र हरण करण्याचा प्रयत्न करतात”; संजय शिरसाठांचा संजय राऊतांना टोला
4

Sambhajinagar : “हे चरित्र हरण करण्याचा प्रयत्न करतात”; संजय शिरसाठांचा संजय राऊतांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.