
अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! (Photo Credit- X)
यंदा हिवाळा जोरदार गेला. किमान पारा खाली गेल्याने शहरभर चांगलीच हुडहुडी भरली होती. दरम्यान, आता हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले आहेत. याअनुसर फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीपासून शहरातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून उत्साहाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहराचे कमाल तापमान सातत्याने वाढत आहे. रविवारी कमाल तापमान ३३. ४ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. आतापर्यंतची ही सर्वोच्च नोंद आहे.
Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?
कमालसोबतच किमान तापमानदेखील वाढीस लागले आहे. १७. १ अंशापर्यंत वाढले आहे. परिणामी सकाळी ९ वाजेपासूनच दिवसादेखील उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दरम्यान, दिवसा उन्हाचा चटका बसत असला तरी पहाटे मात्र थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा तापदायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
| दिनांक | कमाल तापमान | किमान तापमान |
| १० फेब्रुवारी | ३१.८ | १५.५ |
| ११ फेब्रुवारी | ३२.० | १५.३ |
| १२ फेब्रुवारी | ३१.६ | १६.० |
| १३ फेब्रुवारी | ३२.२ | १५.६ |
| १४ फेब्रुवारी | ३२.५ | १६.६ |
| १५ फेब्रुवारी | ३३.४ | १७.१ |
दिवसा ऊन चटक्याला सुरुवात झाली असली तरी रात्री तसेच पहाटे हवेत कमालीचा गारवा कायम आहे. ध्रुवीय वारे सक्रिय असल्यामुळे रात्री आणि पहाटे थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुढील आठवडाभर ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी पहाटेच्या थंडीचा मुक्काम वाढल्याचा अंदाज आहे.
Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !