
छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा 'ई-फाईल'वर भर
सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. जिल्ह्यात १० हजारांहून अधिक फेरफार प्रकरणे प्रलंबित आहेत. यावरून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांनी आवश्यक सूचना केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये १ महिन्याच्या आत ही प्रकरणे निकाली पाहिजेत. महसूल विभागातील दिरंगाई आता खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मतदार यादा पुनानराक्षण कायक्रमात ग्रामाण भागात हे काम समाधानकारक असले तरी शहरात मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल चिंता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हे काम ‘टाइम बॉण्ड’मध्ये पूर्ण करण्यासाठी विशेष बैठका घेऊन गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यासोबतच जनगणनेचे काम देखील प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणतीही फाईल विहित मुदतीत संबंधित टेबलावरून पुढे सरकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्या टेबलावर फाईल किती वेळ थांबली आहे, याचे मी स्वतः वैळोवेळी निरीक्षण करणार असून, संबंधितांना थेट जाब विचारला जाईल, असा इशारा प्रशासकीय यंत्रणेला दिला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
२०२७ साली नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, घृष्णेश्वर, पैठण या तीर्थक्षेत्रांवर पर्यटकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध सुविधा निर्माण करण्यासाठी ९५० कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये उज्जैन, वाराणसीच्या धर्तीवर वेरूळचा विकास करण्यासाठी ८०० कोटी तर पैठण, आपेगावच्या विकासासाठी सुमारे १५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळणे अशक्य असल्याने प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी निधी मागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जे काम सध्या सुरु आहे, ते मुदतीत पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा