
जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले
पाहणीदरम्यान वर्गखोल्यांच्या छतावरील प्लास्टर निखळल्याचे, अनेक ठिकाणी छताला तडे गेल्याचे तसेच पावसाचे पाणी थेट वर्गखोल्यांमध्ये झिरपत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शाळेची तातडीने तांत्रिक पाहणी करण्याची तसेच दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा थेट परिणाम अध्यापनावर होत आहे. गळतीमुळे काही वर्गातील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसवावे लागत असून, नियमित अध्यापनातही अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रभाकर सोन्ने यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने शाळेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारत मंजूर करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि भीतीमुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.