
पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर...; EV क्रांतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान (Photo Credit- X)
जागतिक परिस्थितीची तुलना करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या संकटामुळे जगातील प्रगत अर्थव्यवस्थांनाही मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी आठवड्यातून २-३ दिवसांचा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. आपल्या शेजारील पाकिस्तान देशात पेट्रोलचे दर प्रति लीटर साडेचारशे रुपयांवर (Rs 450) पोहोचले आहेत, आणि तरीही तिथे इंधन मिळेनासे झाले आहे. भारतामध्ये जागतिक तुलनेत केवळ ३ ते साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. मोदी सरकारने भारताचा ‘इंधन पोर्टफोलिओ’ वैविध्यपूर्ण केल्यामुळेच आपण या संकटाचा सामना अत्यंत सक्षमपणे करू शकलो आहोत.”
LIVE | 4th Edition of ‘NavaBharat Navarashtra: Maharashtra 1st Conclave 2026’ 🕡 6.31pm | 19-5-2026📍Mumbai.@TheNavbharatliv @navarashtra#Maharashtra #Mumbai #MagneticMaharashtra https://t.co/r5a3payP7n — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2026
या इंधन संकटाचा सामना करण्यासाठी भारताकडे भविष्यात काय पर्याय आहेत, याचे विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी ‘ईव्ही’ (EV) क्षेत्रातील क्रांतीवर प्रकाश टाकला, ते म्हणाले देशातील दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत सध्या सुमारे ७० टक्के हिस्सा हा इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळत आहे. तर, दुचाकींनंतर आता हळूहळू चारचाकी वाहनांच्या क्षेत्रातही ईव्ही तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे. भारतात सौर ऊर्जेची मोठी उपलब्धता असल्यामुळे आपल्याकडे विजेची अजिबात कमतरता नाही. हीच सौर ऊर्जा भविष्यात पेट्रोल-डिझेलला सक्षम पर्याय ठरणार आहे.
आपण सध्या एका मोठ्या संक्रमण काळामधून जात आहोत, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या आव्हानाचा फायदा घेत आपण देशांतर्गत पर्यायी इंधनांच्या निर्मितीवर भर दिला पाहिजे. मग ती वीज असो, सीबीजी असो किंवा इतर पर्यायी इंधन स्रोत असोत; या क्षेत्रांमध्ये आपण जितकी जास्त गुंतवणूक करू, तितकेच आपले परदेशातून होणाऱ्या इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र या आव्हानाचा स्वीकार करून ‘ग्रीन एनर्जी’च्या दिशेने देशात अग्रस्थानी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.