Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे…”; महापरिनिर्वाण दिनानिमित्त CM देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 06, 2025 | 03:31 PM
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे…”;  महापरिनिर्वाण दिनानिमित्त CM देवेंद्र फडणवीसांचे भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन 
डॉ. आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले – राज्यपाल 
भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – फडणवीस

मुंबई: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr babasaheb ambedkar)राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचे नमूद करून बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले.

LIVE | भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन 🕘 स. ८.४८ वा. | ६-१२-२०२५📍मुंबई.#Maharashtra #Mumbai #MahaparinirvanDiwas https://t.co/ap3EjdQCnw — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 6, 2025

समाजात विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे त्यांनी नमूद केले.आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारक विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हाताशी पुस्तक, मुखी बुद्धवंदना आणि पुढे जे घडलं…! डॉ. आंबेडकरांच्या निधनापूर्वीचे 24 तास कसे होते?

महामानव बाबासाहेबांचे विचार राष्ट्राला मार्गदर्शक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाच्या लोकशाहीला दृढ पाया दिला. त्यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Cm devendra fadnavis statement abou dr ambedkar mahaparinirwan din dadar news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • dr babasaheb amdekar
  • Mahaparinirvan Din

संबंधित बातम्या

Zero Waste Mumbai Vision: दावोसमध्ये ‘महाराष्ट्र मॉडेल’ची जगभर दखल! मुंबईसाठी ‘Zero Waste’ व्हिजन सादर 
1

Zero Waste Mumbai Vision: दावोसमध्ये ‘महाराष्ट्र मॉडेल’ची जगभर दखल! मुंबईसाठी ‘Zero Waste’ व्हिजन सादर 

Davos Investment: एआय आणि शाश्वत उद्योगक्षेत्रात MMRDA ची भरारी; तब्बल २६ अब्ज डॉलर्सचे…
2

Davos Investment: एआय आणि शाश्वत उद्योगक्षेत्रात MMRDA ची भरारी; तब्बल २६ अब्ज डॉलर्सचे…

‘सर्वांसाठी न्याय, जलद न्याय! नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत….; CM देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार
3

‘सर्वांसाठी न्याय, जलद न्याय! नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत….; CM देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

Devendra Fadnavis in WEF Davos: तब्बल ‘इतक्या’ कोटींचा करार एका वर्षात उत्पादनात; मुख्यमंत्री फडणवीसांचे भरत गीते यांचे कौतुक
4

Devendra Fadnavis in WEF Davos: तब्बल ‘इतक्या’ कोटींचा करार एका वर्षात उत्पादनात; मुख्यमंत्री फडणवीसांचे भरत गीते यांचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.