
टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ
मुंबईत क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक मोहीम हाती घेत महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू होत असलेल्या या अभियानाचा शुभारंभमंगळवार, २६ मे रोजी धारावी आणि सायन येथे होणार आहे. धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे सकाळी ११ वाजता, तर सायन येथील लोकमान्य टिळका महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप तसेच ‘टीबीमुक्त मुंबई’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
‘लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता…’; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी
कार्यक्रमास खासदार अनिल देसाई, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, सुनील शिंदे, राजहंस सिंह यांच्यासह महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे आणि विविध समित्यांचे अध्यक्ष, येथे राज्यपाल जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि आशा कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. गटनेते उपस्थित राहणार आहेत.
अभियानांतर्गत अतिजोखमीच्या लोकसंख्येची हॅडहेल्ड क्ष-किरण संयंत्राद्वारे तपासणी, सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्थेत निदान झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार, तसेच रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना ‘टीबी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट’ देण्यावर भर दिला जाणार आहे.याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.