Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सुप्रीम कोर्टाने यांना झापल्यानंतर…”; महापालिका निवडणुकांवरून भाई जगतापांची सरकारवर जोरदार टीका

कॉँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांनी आज रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधु एकत्र येणार, दोन्ही पवार एकत्र येणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शस्त्रबंदी यावर भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2025 | 04:17 PM
“सुप्रीम कोर्टाने यांना झापल्यानंतर…”; महापालिका निवडणुकांवरून भाई जगतापांची सरकारवर जोरदार टीका
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी: कॉँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांनी आज रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधु एकत्र येणार, दोन्ही पवार एकत्र येणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शस्त्रबंदी यावर भाष्य केले आहे. राज्यात सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही असे भाई जगताप म्हणाले आहेत.

रत्नागिरीमध्ये बोलताना आमदार भाई जगताप म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने स्वतःहून लावलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने यांना झापल्यानंतर निवडणुका घ्यावा लागत आहेत. येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. या निवडणूका कार्यकर्त्यांच्या असतात, त्यामुळे ह्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे.”

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार की नाही हे केवळ राज ठाकरेच सांगू शकतात. ते काय करणार आहेत ते राज ठाकरेच सांगू शकतात. दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येणार की नाही ते येत्या काळातच कळेल. दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे. मात्र राजकीय घडामोडीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही’, असे भाई जगताप म्हणाले.

शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?

राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sharad Pawar-Ajit Pawar News: शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान

माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेससोबत युती करणं हेच चुकीचंच होतं. हे आम्ही त्यांना आधीपासूनच सांगत होते. पण आता त्यांना त्याचा प्रत्यय येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवाले तुमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाहीत. हेच आम्ही त्यांना अनेकदा सांगत होतो. पण आता जसजसे त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे. तसतसे ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीतील ही फूट कौटुंबिक मानली जात असली तरी ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

काँग्रेस तरी कुठे उबाठासोबत आहे. गेल्या चार महिन्यात त्यांची काँग्रेससोबत कोणती बैठक झाली, कधी यांनी त्यांना फोन केला, किंवा त्यांना यांना फोन केला असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला. पुढील काळात उबाठा गटाल एकट्यानेच वाटचाल करावील लागणार असल्याचं दिसत आहे. हा एकट्याचा प्रवास त्यांना खूप महागात पडणार आहे. ते हिंदुत्त्वाशी एकरूप राहिले नाही, मग महाविकास आघाडीत जाऊनही ते महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाहीत. त्यांची अवस्था आता ना घर का ना घाट का अशी झाली आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.

Web Title: Congress mla bhai jagtap criticizes to mahayuti government about local body eection ratnagiri marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Local Body Elections
  • Mahayuti Government
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri News: मनुष्यबळाची कमतरता; मात्र भातशेतीची ओढ कायम
1

Ratnagiri News: मनुष्यबळाची कमतरता; मात्र भातशेतीची ओढ कायम

अठरा हातांचा गणपती कधी पाहिला आहात का? जाणून घ्या कुठे आहे ‘हे’ ठिकाण
2

अठरा हातांचा गणपती कधी पाहिला आहात का? जाणून घ्या कुठे आहे ‘हे’ ठिकाण

Leopard News: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडले खरे पण…; देवरुखमध्ये घडले काय?
3

Leopard News: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडले खरे पण…; देवरुखमध्ये घडले काय?

परमेश्वरा हाच का रे माझा गुन्हा! पदपथावर झोपलेल्या व्यक्तीवर जीवघेणा…; नेमका विषय काय?
4

परमेश्वरा हाच का रे माझा गुन्हा! पदपथावर झोपलेल्या व्यक्तीवर जीवघेणा…; नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.