Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024: महाराष्ट्राला डावलून गुजरातच्या कांद्यांच्या निर्यातीला प्राधान्य का? काँग्रेसचा मोदींना खडा सवाल

डिसेंबर 2023 पासून मोदी सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. कांदा लागवडीच्या हंगामात राज्यातील पाऊस आणि पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 08, 2024 | 08:08 PM
Maharashtra Election 2024: महाराष्ट्राला डावलून गुजरातच्या कांद्यांच्या निर्यातीला प्राधान्य का? काँग्रेसचा मोदींना खडा सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 नोव्हेंबर) धुळ्यात महायुतीसाठी प्रचारसभा घेतली. महायुतीने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली, पण राही लोक डोळ्यात धूळफेक करण्याचा उद्योग करत आहेत. आमच्या जाहीरनाम्यात प्रत्येकासाठी काही ना काही आहे, पण महाआघाडीच्या वाहनाला ब्रेक नाही, चाक नाही, त्यामुळे ते लूटमार आणि लबाडीचे राजकारण करत आहेत, अशी टीकाही केली. पंतप्रधान मोदींच्या या टीकेला काँग्रेसनेही सडेतोड उत्तर देत महायुतीवर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

महाराष्ट्रातील लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत गुजरातच्या पांढऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना का प्राधान्य दिले जात आहे, भाजपने महाराष्ट्रातील आदिवासींचे वनहक्क का कमकुवत केले? असा खडा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या धुळे आणि नाशिकमधील सभांपूर्वी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा: गारमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला; केवळ 20-24 रुपयांमध्ये लावता येईल बोली!

डिसेंबर 2023 पासून मोदी सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. कांदा लागवडीच्या हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना अपुरा पाऊस आणि पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला आणि बहुतांश शेतकरी त्यांच्या सामान्य पिकाच्या केवळ 50 टक्के उत्पादन घेऊ शकले.

जयराम रमेश म्हणाले, ‘जेव्हा कांद्याचे चांगले पीक तयार झाले, तेव्हा शेतकऱ्यांना मनमानी निर्यात निर्बंधांचा सामना करावा लागला, पण त्याचवेळी विक्रीचे दर खूपच कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यानंतर केंद्र सरकारने प्रामुख्याने गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली.

हेही वाचा: “माता-भगिनी, कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी धारकरी…”; महेश लांडगेंचा विरोधकांना गर्भित इशारा

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी जे प्रामुख्याने लाल कांद्याची लागवड करतात, ते महिनोनमहिने यापासून वंचित होते. माजी केंद्रीय मंत्री रमेश म्हणाले की, कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली असली तरी निर्यातीवर २० टक्के शुल्क अजूनही लागू आहे. रमेश यांनी ‘X’ वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेला प्राधान्य देताना त्यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे इतके दुर्लक्ष का केले, त्यांनी असा पक्षपात का केला, या प्रश्नाचे उत्तर आपले ‘अजैविक’ पंतप्रधान देऊ शकतात का दाखवला?

महाराष्ट्रातील आदिवासींचे वनहक्क भाजपने का कमकुवत केले, 2006 मध्ये काँग्रेसने क्रांतिकारी वन हक्क कायदा (FRA) संमत केला, ज्याने आदिवासी आणि जंगलात राहणाऱ्या समुदायांना त्यांच्या स्वत: च्या जंगलांचे व्यवस्थापन करण्याचा आणि त्यांच्याद्वारे गोळा केलेल्या वन उत्पादनांमधून आर्थिक लाभ मिळवण्याचा कायदेशीर अधिकार दिला.

हेही वाचा: दिवसा ढवळ्या झोपल्याने होतो ‘हा’ आजार; सवय बदला, आरोग्य सुधारेल

रमेश म्हणाले, महाराष्ट्रातील महायुती सरकार आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात अपयशी का ठरले आहे, असा सवालही काँग्रेस सरचिटणीसांनी केला आहे. नाशिक महापालिकेसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात महायुती सरकारला आलेले अपयश हा लोकशाहीवर आणि नाशिकच्या नागरिकांच्या हक्कांवर मोठा आघात आहे, असेही त्यांनी नमुद केले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारादरम्यान त्यांची टिप्पणी आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Congress questions pm narendra modi over gujarats onion exports nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 08:08 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • narendra modi

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
2

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
3

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
4

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.