• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congresss Bhaskarrao Patil Khatgaonkar To Join Ajit Pawars Ncp

Congress Politics: काँग्रेसच्या गडाला सुरूंग; बडा नेता अजित पवारांच्या गळाला

आमदार खासदार पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. निवडणुकीनंतरही अनेक बड्या नेत्यांनी पक्षांना रामराम केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 22, 2025 | 02:39 PM
दीनानाथ रुग्णालय प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश

दीनानाथ रुग्णालय प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नांदेड: राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आमदार खासदार पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. निवडणुकीनंतरही अनेक बड्या नेत्यांनी पक्षांना रामराम केला. अशातच महाविकास आघाडीसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता त्यांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (21 मार्च) त्यांचा अधिकृत प्रवेश होणार असून, यामुळे मराठवाड्यातील अजित पवार गटाचे बळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर आहेत.त्यांच्या नांदेड दौऱ्यात भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करतील. त्यांच्यासोबत त्यांची सून मीनल खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोखरना हेदेखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहे. खतगावकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. अशोक चव्हाण यांना अप्रत्यक्ष शह देत, आपल्या मेव्हण्याला पक्षात सामील करून घेत एकाच वेळी दोन रणनीतिक फायदे मिळवल्याची चर्चा सुरू आहे.

समृद्धी महामार्गाने टोलच्या माध्यमातून महाराष्ट्राला केले ‘समृद्ध’; फेब्रुवारीत तब्बल 10 लाख वाहनांनी केला प्रवास

भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसमध्ये मान सन्मान मिळत नसल्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे खतगावकर यांनी म्हटले आहे. याशिवाय, विधानसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीयांवर झाला होता. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर ठपका ठेवत, भास्करराव पाटील खतगावकर यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे गटाकडून ऑफर होती, पण राष्ट्रवादीची निवड

यावेळी बोलताना खतगावकर म्हणाले की, 23 तारखेला नरसी येथे 15 ते 20 हजार लोकांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा होईल. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोखरना, त्यांची सून डॉ. मीनल खतगावकर आणि 300 सरपंच, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच, त्यांना शिंदे गटाकडूनही पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली होती, मात्र सेक्युलर विचारसरणीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे पसंत केले. अजित पवार हे मेहनती नेते असून, महाराष्ट्रातील प्रत्येक समस्येची त्यांना सखोल जाण आहे, असेही त्यांनी सांगितले.

नशेसाठीची बंटा गोळी विकणाऱ्याला ठोकल्या बेड्या; शिवणेतून घेतले ताब्यात

भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, आपल्या भागातील विकासाचे प्रश्न न सुटल्याने आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्यामुळे पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागला. नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हा बदल गरजेचा होता, असेही त्यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानात मोठी तफावत पाहायला मिळाली. 29 हजार मतांचा फरक पडला, आणि चव्हाण कुटुंबीयांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळेच हा फरक झाल्याचा आरोप खतगावकर यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कुटुंबीयांमुळे घेतलेला निर्णय

खतगावकर म्हणाले की, अशोक चव्हाण हे त्यांचे नातेवाईक आणि मेव्हणे आहेत. वसंतराव चव्हाण यांचे बंधू आनंदराव चव्हाण यांच्या मुलीचा विवाह त्यांच्या कुटुंबात झाला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळू शकली असती, मात्र कुटुंबीयांमध्ये परस्परविरोधी उमेदवारी देणे संयुक्तिक वाटले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Congresss bhaskarrao patil khatgaonkar to join ajit pawars ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Congress

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.