Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवावं; श्रीरंग बारणेंची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी,चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक अडकले आहेत. या संकटात अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात अचानक वाढ केली आहे. हे अतिशय वाईट आणि अमानवीय आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2025 | 11:54 AM
जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवावं; श्रीरंग बारणेंची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवावं; श्रीरंग बारणेंची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर राज्यासह देशाच्या विविध भागातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. पर्यटक तातडीने आपल्या राज्यात परतण्याचे प्रयत्न करत असताना अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात अचानक वाढ केली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

खासदार बारणे यांनी याबाबत हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र दिले आहे. पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जण मृत्युमुखी पडले. देशभरातील विविध भागांतील नागरिक जम्मू काश्मीरमधील सुंदरता पाहण्यासाठी गेले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक पर्यटक तातडीने आपल्या राज्यात परतण्याचे प्रयत्न करत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक अडकले आहेत. या संकटात अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात अचानक वाढ केली आहे. हे अतिशय वाईट आणि अमानवीय आहे. तिकीट दर वाढविणाऱ्या विमान कंपन्यांवर आवश्यक कारवाई करावी. जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ करावी. त्यामुळे पर्यटक सुरक्षित आपल्या राज्यात पोहोचतील. या आपत्कालीन परिस्थितीत तिकीट दरात वाढ करू नये असे निर्देश विमान कंपन्यांना द्यावेत. तिकीट आरक्षणात पर्यटकांना प्राधान्य द्यावे. त्यामुळे पीडित परिवार, पर्यटकांना दिलासा मिळेल, असे खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Control the ticket prices of flights departing from jammu and kashmir shrirang barne demands from the aviation minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Jammu and Kashmir
  • pahalgam attack
  • Shrirang Barne

संबंधित बातम्या

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना
1

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.