Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीमुळे आंबळे परिसरात पिकांचे नुकसान ; उत्पादनांवर होणार परिणाम 

खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

  • By Aparna
Updated On: Oct 14, 2022 | 04:28 PM
अतिवृष्टीमुळे आंबळे परिसरात पिकांचे नुकसान ; उत्पादनांवर होणार परिणाम 
Follow Us
Close
Follow Us:

माळशिरस : मागील तीन – चार दिवसांपासून परतीच्या मुसळधार पावसाने आंबळे (ता.पुरंदर) परिसराला झोडपले आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

शेतातील पाणी निघत नसल्याने पिके कुजू लागली आहेत. बाजरी, मूग, तूर, सोयाबीन, घेवडा, भुईमूग, सूर्यफूल, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप पिकांवर अतिवृष्टीचा विपरीत परिणाम होत आहे. पावसामुळे शेतीतील पिके काढणीची कामे खोळंबली आहेत. पिके आणि तण एकसारखीच वाढली आहेत. पाऊस उघडीप देत नसल्याने तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, घेवडा, चवळी ही कडधान्ये पिके जागेवर कुजत आहेत.

इतर पिकांची वाढही उन्हाअभावी खुंटली आहे. कीड व रोगराईलाही निमंत्रण मिळत आहे. शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या खरिपातील सर्वच पिके वाया जाण्याची भीती असल्याने चिंतेत भर पडली आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळात याच शेतकर्‍यांनी सर्वांना तारले. आता याच बळीराजावर अतिपावसामुळे उपासमारीची वेळ येते की काय असा? प्रश्न उभा राहिला आहे. अनेक महिला- पुरूष दुसर्‍यांच्या शेतात शेतमजुरी करून घरखर्च भागवत असतात. मात्र, त्यांची मजुरीही मंदावली आहे. दिवाळीचा सण गोड जाणार की दिवाळे काढणार, हीच चिंता सर्वांना आहे.

फवारणीचा खर्चही वाया
पिकांवरील वाढत्या कीड-रोगांमुळे पिकांवर औषध फवारणी करूनही उपयोग होत नाही. औषधे फवारली तरी पावसामुळे ते वाया जात आहे. रोग आटोक्यात येत नसल्याने पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. भाजीपाला, फळ पिकांचे मोठे नुकसान होत असून, केलेला खर्चही निघणार नसल्याने जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. चारा पिकेही वाया गेली असून भविष्यातील चाराटंचाईनेही बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.

 रब्बी पेरण्यांनाही होतोय उशीर
यंदा मुबलक पाऊस आणि शाश्वत पाण्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा उलटला तरीही किमान जिरायती भागात रब्बी पेरण्यांची लगबग सुरू झालेली नाही. जमिनीला वाफसाच नसल्याने, शेतकऱ्यांनी पेरण्यांचे धाडस केले नाही. पावसाने उघडीप दिल्यावर आठवडाभरात जिरायती भागातील रब्बी पेरणीस सुरुवात होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Damage to crops in amble area due to heavy rain impact on products nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2022 | 04:28 PM

Topics:  

  • Malshiras
  • Pune
  • Purandar

संबंधित बातम्या

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
1

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
2

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
3

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन
4

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.