Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिक्रमणामुळे मीठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प रखडला; टप्पा – २ चे आतापर्यंत १५ टक्केच काम पूर्ण

मीठी नदीच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प रखडला आहे. पालिकेच्या नियोजनानुसार आतापर्यंत प्रकल्पाचे टप्पा २ चे काम ३० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र १५ टक्केच काम पूर्ण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2022 | 06:42 PM
अतिक्रमणामुळे मीठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प रखडला; टप्पा – २ चे आतापर्यंत १५ टक्केच काम पूर्ण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मीठी नदीच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प रखडला आहे. पालिकेच्या नियोजनानुसार आतापर्यंत प्रकल्पाचे टप्पा २ चे काम ३० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र १५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. येथील अतिक्रमण हटवल्य़ानंतर तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी वेळ जात असल्याने जेथे अतिक्रमण नाही, त्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात मुसळधार पावसांत मीठी नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होते. यावर उपाययोजनांसाठी विविध प्रकल्प राबवले जात आहे. यासाठी मागील अनेक वर्षापासून कोट्य़वधी रुपये खर्च केला जातो आहे. मीठीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पालिकेकडून प्रकल्प राबवला जातो आहे. मात्र या प्रकल्पात नदी परिसरात असलेली अतिक्रमण आड येत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र १५ टक्केच पूर्ण झाले आहे. नदी परिसरात सुमारे ९०० अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे हटवणे पालिकेसमोर आव्हान आहे. येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. रहिवाशांना स्थलांतर करण्यासाठी पुरेसा जागा नसल्याने अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनापुढे पेच कायम राहिला आहे. त्यामुळे जिथे अतिक्रमण नाही तिथे काम सुरू करण्यात आले आहे, असे पालिकेच्या एका अधिका-याने सांगितले. प्रकल्पाचा दुसरा टप्प्यासाठी सुमारे १५६९ कोटी रुपये खर्च येणार आहे. २०२० काम सुरु झाले. हे टप्पा पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. फिल्टर पाडा ते सीएसटी ब्रिज दरम्यान हा प्रकल्प सुरू आहे. काही ठिकाणी रिटेनिंग भिंती बांधल्या जात आहेत. नदीत थेट विसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. याचे नेटवर्क मुख्य गटारांशी जोडले जाणार आहे.

[read_also content=”पुण्यातील आंबेगाव पठारमध्ये पाण्याच्या मागणीसाठी रासपाचा हंडा मोर्चा; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात https://www.navarashtra.com/maharashtra/rsps-handa-morcha-for-water-demand-in-ambegaon-plateau-pune-police-in-riot-gear-stormed-a-rally-on-friday-removing-hundreds-of-protesters-by-truck-nrdm-264221.html”]

दरम्यान, २०१९ मध्ये सुरू झालेले पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाकडे आहे. हे काम मेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात काही अडथळे आहेत. या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देण्याचा विचार केला जातो आहे, असेही संबंधित अधिका-य़ाने सांगितले.

Web Title: Encroachment hampers mithi river rehabilitation project so far only 15 of phase ii has been completed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 06:42 PM

Topics:  

  • C M Uddhav Thackeray
  • devendra fadanvis
  • mumbai mahapalika
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिकेच्या मुदतठेवींत मोठी घट! तीन वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांच्या निधीवर मारला डल्ला
1

Mumbai News: पालिकेच्या मुदतठेवींत मोठी घट! तीन वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांच्या निधीवर मारला डल्ला

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं
2

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Mumbai: शिवसेनेत ‘मराठी’ मुद्द्यावरून जुंपली! संजय निरुपमांचा सक्तीला विरोध, सरनाईकांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी
3

Mumbai: शिवसेनेत ‘मराठी’ मुद्द्यावरून जुंपली! संजय निरुपमांचा सक्तीला विरोध, सरनाईकांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला
4

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.