Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP-Congress Politics: ‘निकालापूर्वीच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील पराभव स्वीकारला’; काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपला डिवचलं

 'गेल्या 10 महिन्यांत आम्ही तेलंगणात 50,000 सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. तुम्ही समिती पाठवा. ज्यांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत ते मी गोळा करीन आणि तुम्ही मोजू शकता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 26, 2024 | 11:16 AM
BJP-Congress Politics: ‘निकालापूर्वीच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील पराभव स्वीकारला’; काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपला डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  महाराष्ट्र निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे.  महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार संपण्यापूर्वीच पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे परदेश दौऱ्यावर गेले आहेत, त्यावरून भाजपने पराभव स्वीकारल्याचे दिसून येते, अशी खोचक टीका  तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी  तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेदेखील काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. याच वेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

‘पंतप्रधान मोदी आणि भाजपने महाराष्ट्रात पराभव स्वीकारला’

रेवंथ रेड्डी म्हणाले की, ‘महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसापूर्वी पंतप्रधान मोदी देश सोडून परदेशात गेले. यावरून भाजप आणि मोदीजींनी पराभव स्वीकारल्याचे दिसून येते.  पण जेव्हा मी  वर्तमानपत्रात भाजपच्या जाहिराती पाहिल्या तेव्हा मला असं वाटलं की निवडणूक जिंकण्यासाठी ते देशही तोडू शकतात.  पण गेल्या 11 वर्षांत तुम्ही काय केलं, असा सवालही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला उपस्थित केला.

Vinod Tawade News: काँग्रेस काळातच अदानींंचा विकास झाला; विनोद तावडेंचा राहुल गांधींवर पलटवार

भाजप सरकार आश्वासने पूर्ण करत नसल्याचा आरोप

रेवंथ रेड्डी म्हणाले की, 2014 मध्ये भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. 2020 पर्यंत देशातील प्रत्येक गरीबाला घर दिले जाईल, असेही सांगण्यात आले. ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे विसराच. पण त्यांनी तीन काळे कृषी कायदे आणले, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिल्लीभोवती आंदोलन करावे लागले. यात700 हून अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला. पंतप्रधान मोदींना बिले मागे घेऊन शेतकऱ्यांची माफी मागावी लागली.

केंद्र सरकारला दिलेले आव्हान

रेड्डी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात दिलेली आश्वासने पूर्ण  न केल्याचा आरोप केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री या नात्याने मी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांना आव्हान देऊ इच्छितो की, तुमच्यात हिंमत असेल तर एका केंद्रीय मंत्र्यासह केंद्रीय समिती बनवा आणि ती तेलंगणात पाठवा. तुमच्याकडे पैसे नसतील तर मी दिल्ली किंवा मुंबईला फ्लाइट पाठवीन, पण तुम्ही या आणि गॅरंटी पूर्ण झाली की नाही ते तपासा.   आम्ही सरकार स्थापन केल्याच्या 25 दिवसांत 23 लाख शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे, एकूण 18,000 कोटी रुपयांचे शेती कर्ज माफ केले.   ‘गेल्या 10 महिन्यांत आम्ही तेलंगणात 50,000 सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. तुम्ही समिती पाठवा. ज्यांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत ते मी गोळा करीन आणि तुम्ही मोजू शकता. जर 50,000 पेक्षा कमी एक व्यक्ती असेल तर मी माफी मागतो.

चांदीची चमक वाढणार; दरात 125000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होण्याची शक्यता!

Web Title: Even before the results prime minister modi accepted the defeat in maharashtra nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 04:43 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • PM Narendra Modi
  • Revanth Reddy

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
2

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
3

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
4

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.