Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ

रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 09, 2026 | 03:06 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले
  • रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे
  • शेतकऱ्यांना २०० ते २५० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत
एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे शेतीमालाला मिळणारा अपुरा दर, त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत होत असलेली सातत्यपूर्ण वाढ यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पुन्हा एकदा गंभीर अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकरी आधीच चिंतेत होते. यावर्षीही खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे.

खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने आता आगामी रब्बी हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. वाढता उत्पादन खर्च आणि त्याच्या तुलनेत न मिळणारा भाव यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत.

अलीकडच्या काळात उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते हा शेतीचा अविभाज्य घटक बनला आहे. ही गरज लक्षात घेता शासनाकडून खतांवर अनुदान दिले जात असले तरी प्रत्यक्ष बाजारात खतांचे दर गेल्या अनेक वर्षांपासून वाढतच आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात योग्य दर न मिळाल्याने संपूर्ण शेती अर्थचक्रच कोलमडले आहे.

Raigad News: प्रभागात केलेल्या विकासाकामांमुळेच आम्ही विजयी होऊ; महायुतीच्या उमेदवारांनी केला दावा

हंगाम सुरू होण्यापूर्वीच खतांच्या किमतीत गोणीमागे २०० ते २५० रुपयांची वाढ झाली आहे. सुरू होत असलेल्या हंगामात खतांचे दर अस्मानाला भिडल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझे आणखी वाढणार असून, उत्पादन खर्चात मोठी भर पडणार आहे. एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नसताना, दुसरीकडे खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. जुन्या व नवीन दरांमधील मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत.

दुसऱ्या खताची बळीराजावर सक्ती

एकीकडे रासायनिक खतांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे काही कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना जास्त दराने खते विकली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. युरिया खरेदी करताना त्यासोबत शेतकऱ्यांना नको असलेले किंवा न वापरण्याजोगे दुसरे खत सक्तीने घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात तक्रार कुणाकडे करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

Dapoli News: पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ; एकाचाच तब्बल ६ जणांना चावा

काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राचे दुकानदार त्या शेतकऱ्यांना वेठीस धरून पुढे खते देत नसल्याचे प्रकारही घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी व गरज पडल्यास त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, असे खांडगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी किरण ससे यांनी सांगितले.

काय पिकवावे, हा प्रश्न गंभीर – शेतकरी नेते

“गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सोयाबीन आणि कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कापूस, मका, उडीद, तूर यांसारख्या प्रमुख पिकांनाही अपेक्षित भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत आता नेमके काय पिकवावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत,” अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजेंद्र गीते यांनी व्यक्त केली.

Web Title: Farmers are in trouble as chemical fertilizers price increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers
  • Marathi News
  • Seeds and Fertilizer

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.