Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

उसाच्या बिलांतून प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2025 | 12:50 PM
प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर/नवनाथ खिलारे : राज्यातील बहुतांश भागात पूर, अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती, पिके, जनावरे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही काही भागांत पूरस्थिती आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईतून आधार देण्याची सरकारची जबाबदारी असताना पुन्हा शेतकऱ्यांनीच शेतात घाम गाळून, कष्टाने पिकविलेल्या उसाच्या बिलांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पूरग्रस्त निधीसाठी प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

महापुराने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके, घरे वाहून गेली आहेत. शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांना शासनाकडून भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने मोठी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. असे असताना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनेक निकष लावून पंचनामे करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे याच शेतकऱ्याने पिकवलेल्या ऊसाच्या बिलातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन १० रुपये तर पूरग्रस्त निधीसाठी ५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. या निर्णयाला मूक संमती देणारे मंत्री, आमदार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात ३३० कोटी रूपये कपात होणार

शेतकऱ्यांच्या एक टन उसाला जवळपास २७.५० रूपयांची कपात केली जाणार आहे. मागील गळीत हंगामात राज्यातील सुमारे २०० साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. यात ९९ सहकारी व १०१ खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. यावर्षी राज्यात १२ कोटी टन उस गाळप गृहीत धरल्यास शेतकऱ्यांचे सुमारे ३३० कोटी रूपये कपात होणार आहेत.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

शासन २२ हजार घेऊन १६ हजार देणार

माझा ८०० टन ऊस कारखान्याला गेला तर बिलातून २२ हजार रुपये एवढी रक्कम कपात केली जाणार आहे. दुसरीकडे शासन अतिवृष्टीचे हेक्टरी अंदाजे ८ हजार रुपये मदत देईल. त्यातही २ हेक्टरची अट आहे. जास्तीत जास्त मला १६ हजार रुपये नुकसान मिळेल. म्हणजेच माझ्‌याकडून २२ हजार रुपये घेऊन मदतीच्या नावाखाली फक्त १६ हजार रुपये देणार. हा हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल सिद्धेवाडीचे ऊस उत्पादक शेतकरी भास्करराव जाधव यांनी विचारला आहे.

Web Title: Farmers have reacted angrily to the decision to cut the sugarcane bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
1

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा
3

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
4

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.