Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport: “जबरदस्ती केली तरी …”; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शासनाला शेतकऱ्यांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सप्टेंबर पर्यंत पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची जागा संपादित करण्याचे आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 23, 2025 | 10:05 PM
Purandar Airport: "जबरदस्ती केली तरी ..."; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शासनाला शेतकऱ्यांचा इशारा

Purandar Airport: "जबरदस्ती केली तरी ..."; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शासनाला शेतकऱ्यांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

सासवड:  आम्हाला विश्वासात न घेता शासन आमच्या गावात विमानतळ प्रकल्पाचा घाट घालीत आहे. आम्ही याविरोधात दहा वर्षे कडाडून विरोध करीत आलो आहे. इंग्रजांचा कायदा लोक वस्ती पुनर्वसन करण्याचा आहे, मात्र सध्याचे लोकांना विस्थापित करीत आहे. प्रकल्पामुळे आमची हजारो एकर जमीन जाणार असून माणसांसह जनावरे, प्राणी, पशु, पक्षी सर्वच विस्थापित होत आहे. आमच्या नावाखाली प्रकल्प करणार आणि आम्हीच विस्थापित होणार असेल तर प्रकल्प कोणासाठी करताय ? आम्ही जायचे कोठे ?  असे प्रश्न उपस्थित करून शासनाने जबरदस्ती केली तरी एक एकर सुद्धा जमीन देणार नाही,असा थेट इशारा शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सप्टेंबर पर्यंत पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची जागा संपादित करण्याचे आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामळे प्रकल्पबाधित शेतकरी पीएस मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी नगरपालिका पासून तहसील कार्यालयापर्यंत हातात काळे झेंडे घेत मोर्चा काढून शासनाचा जोरदार निषेध केला. पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देवून आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोच कराव्यात असे आवाहन करण्यात आले.

यावेळी वनपुरी सरपंच राजश्री कुंभारकर, कुंभारवळण सरपंच मंजुषा गायकवाड, एखतपूर मुंजवडी सरपंच शीतल टिळेकर, पारगाव सरपंच ज्योती मेमाणे, उदाचीवादी सरपंच सविता मगर, खानवडी सरपंच स्वप्नाली होले त्याचप्रमाणे महादेव टिळेकर, देविदास कामथे, बापू मेमाणे, संतोष हगवणे, नामदेव कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, रामदास होले, अमोल कामठे, रवींद्र फुले, रामदास कुंभारकर, तात्या मगर, ऍड. शिवाजी कोलते, माऊली मेमाणे, गणेश मेमाणे यांच्यासह विविध गावांचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही लोक प्रतिनिधी म्हणतात शासनाने रेट जाहीर केल्यावर लोक जमीन देण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. अशा शब्दात नाव न घेता आमदार विजय शिवतारे यांच्याकडे अंगुली निर्देश करीत शेती हा शेवटचा पर्याय आहे. ती टिकवून राहिली पाहिजे. शेतकऱ्यांची संमती नसेल तर प्रकल्प होणार नाही. त्यामुळे कोणीही सही करू नये असे आवाहन पीएस मेमाणे यांनी केले आहे.

शासनाने शेतीसाठी पुरंदर उपसा योजनेतून पाणी आणले. त्या जोरावर आम्ही शेतात फळबागा लावल्या, उसाचे उत्पादन घेतोय, आम्ही मोठाली घरे बांधली, शेतीवाडी तयार केली या सर्वांवर नांगर फिरविणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही.आम्हाला विस्थापित करून कोणासाठी  प्रकल्प आणताय ? असा प्रश्न एखतपूर मुंजवडी च्या सरपंच शीतल टिळेकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Maharashtra Election 2024: “शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन…”; नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांचे विधान

शेतकऱ्यांनी एकजूट ठेवावी. आम्ही आंदोलनासाठी परवानगी मागत असताना आम्हाला दिली जात नाही आणि तरीही एवढी लोक जमत असताना परवानगी मिळाल्यास किती लोक येतील याचा शासनाने विचार करावा. असा इशारा देत जमीनच राहणार नसेल तर भविष्यात खाणार काय ?  त्यामुळे याबाबत शासनाने आमच्या सोबत राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर शेतकऱ्यांचा विरोध असताना शासन विमानतळ प्रकपाचा घाट का घालीत आहे ? तुम्ही कितीही जोर लावा आम्ही मागे हटणार नाही. यापुढे आम्ही जोरदार संघर्ष करू पण विमानतळ नको ही एकच आमची मागणी आहे. असे खानवडीचे माजी सरपंच रामदास होले यांनी ठणकावून सांगितले.

विमानतळ प्रकल्पाला विरोध केला म्हणून आम्हाला अटक झाली आहे असे सांगून शेवटपर्यंत विरोध करीत राहणार असे महादेव टिळेकर, संतोष हगवणे यांनी सांगितले. पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, वनपुरीच्या सरपंच राजश्री कुंभारकर, उदाचीवाडी सरपंच सविता मगर तसेच सुनील धिवार, बापू मेमाणे, माऊली मेमाणे, ॲड शिवाजी कोलते यांनीही शासनाचा जोरदार निषेध केला आहे.

Web Title: Farmers warning to maharashtra government land acquisition about purandar airport saswad marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 10:05 PM

Topics:  

  • Purandar Airport
  • Saswad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.