Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray Shivsena Politics: ‘आता थांबायचा विचार करावा, असं वाटतयं…’; शिवसेनेच्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत

कुणाला वाटतं, आमदार- खासदार फुटून जावेत, कुणालाही वाटत नाही. ते शरद पवार साहेबांचं उदाहरण देतात. ते बरोब आहे. पण तरीही अडीच वर्षांनी अजित पवार ४०-४२ आमदारांना घेऊन गेलेच ना,

  • By anuradha sagar
Updated On: Jun 23, 2025 | 12:22 PM
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Follow Us
Follow Us:

Mumbai Politics:  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांना गळती लागली आहे. माजी आमदार-खासदारांपासून स्थानिक कार्यकर्तेही पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. या सगळ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. “आठवेळा निवडणूक जिंकल्यानंतऱ आता थांबायचा विचार करावा, असं वाटत आहे.” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हेतर , महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेतून मला मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. संजय राऊत प्रत्येकवेळी मला सावरण्याची भाषा करतात, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

“भास्कर जाधव हे आमचे सहकारी आणि शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. त्यांचा राजकारणातला अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते असून शिवसेनेच्या वाढीत त्यांचे योगदान मोठेआहे. आम्हा सर्वांसाठी ते प्रिय नेते आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच कोकणात अतात. पक्षाने त्यांना विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यांनी त्या तितक्याच निष्ठेने पेलवल्या आहेत. जेव्हा भास्कर जाधव मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे स्वत: त्यांच्याशी चर्चा करतील. भास्कर जाधव हाडाचे शिवसैनिक आहेत. त्यांनी कायम शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली, शिवसेनेसाठी लढले. पण त्यांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्या मनात कोणत्या वेदना आहेत? ते आम्ही समजून घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

4 राज्यांमधील 5 विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी, लुधियाना पश्चिममध्ये ‘आप’ आघाडीवर; विसावदरमध्ये भाजपचे पुनरागमन,

कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत?

भास्कर जाधव म्हणाले होते की. 2022 साली आमदार फुटून जायला नको होते.असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताा संजय राऊत म्हणाले की, कुणाला वाटतं, आमदार- खासदार फुटून जावेत, कुणालाही वाटत नाही. ते शरद पवार साहेबांचं उदाहरण देतात. ते बरोब आहे. पण तरीही अडीच वर्षांनी अजित पवार ४०-४२ आमदारांना घेऊन गेलेच ना, ज्यांना शेण खायचंय, ज्यांना स्वत:च्या तोंडांत गद्दारीचं शेण भरायचं आहे, ते थांबणार नाहीत. ज्यांना पैशाची आणि सत्तेची चटक लागलेली असते, ते कुणासाठी थांबत नाहीत. ज्यांच्या मागे ईडी,सीबीाआय, पोलिसांचा दबाव असतो. त्यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबत नाहीत. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या कित्येक बैठकांना मी स्वत: हजर होतो. पण प्रत्येकाची दुखणी वेगळीच होती.

“प्रत्येकाचा आजार वेगळा होता,” असे सांगत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “गुलाबराव पाटलांच्या खात्यात ४० ते ५० कोटी रुपये कुठून तरी जमा झाले होते. त्यामुळे ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते, या भीतीने ते थरथरत होते.”

Eknath Khadase on BJP; भाजपमधले ९० टक्के लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप; खडसेंनी भाजपला पुन्हा आरसा

राऊत पुढे म्हणाले, “मला माहिती आहे, त्यांना विचारा. त्यांच्या बँक खात्यात जी रक्कम जमा झाली, त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि अटक होईल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच ते म्हणाले होते की, ‘मला जावं लागेल’.” “या भ्रष्टाचाराच्या कॅन्सरला तुम्ही काय करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी आरोप केला की, “भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे आमदार आणि खासदार पक्ष सोडून गेले. हे भय आणि भ्रष्टाचार निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं.” या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. गुलाबराव पाटील आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: I think we should consider stopping now shiv sena leader hints at political retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • sanjay raut
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
2

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
3

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
4

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.