Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालं असतं’; भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

भिवंडीतील हिंदू धर्मसभा व संत संमेलनामध्ये भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यांना अजित पवार गटाकडून खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 16, 2024 | 02:21 PM
‘400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालं असतं’; भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

भिवंडी : लोकसभा निव़डणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला. राज्यासह देशामध्ये भाजपला अपेक्षित असे य़श आले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपकडून 400 पारचा नारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 300 पार देखील भाजप करु शकली नाही. प्रचारावेळी 400 खासदार आल्यानंतर संविधान बदलण्यात येणार अशी विधान भाजप नेत्यांनीच केली. त्याचा मोठा फटका भाजपला बसला. आता सत्ता स्थापनेनंतर भाजपच्या एका नेत्याने 400 पार सीट आले असते तर भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झाले असते असे विधान भाजप आमदाराने भिवंडीमध्ये केले आहे.

तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत

पडघ्यामध्ये हिंदू धर्मसभा व संत संमेलन याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे हैदराबादमधील आमदार टी. राजा सिंह हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषणामध्ये अनेक दावे व विधानं केली आहेत. मात्र सध्या त्यांच्या एका विधानामुळं चर्चांना उधाण आले आहे. आमदार टी. राजा सिंह भाषणामध्ये म्हणाले, हिंदूंनी महाराष्ट्रात आपल्या सरकारचे व एकनाथ शिंदेंचे हात बळकट करायला हवेत. शिंदे यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशाचा हिंदू तुमच्यासोबत आहे. मलंगगडाला मुक्त करा. शिंदेजी, तुम्हाला कुणाचं भय आहे? आमच्या सभांना आडकाठी आणली जातेय, महाराष्ट्रात येण्यापासून अडवलं जातंय, आमच्यावर एफआयआर टाकल्या जात आहेत. कुणाचं भय आहे? शिंदेजी घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत. पण त्यांच्याबाबतीत तुम्ही विचार करू नका. जो हिंदूंच्या हितावर बोलेल, तो महाराष्ट्रावर राज्य करेल, असे विधान आमदार टी. राजा सिंह यांनी केले. त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे होता याची चर्चा रंगली आहे.

आता हिंदू राष्ट्र होईल असं वाटत नाही

ते पुढे म्हणाले, “हिंदू एकत्र आले तर हिंदू राष्ट्र बनेल हे आम्ही सांगतोय. पण आता असं वाटत नाही की आपण आपल्या भारताला हिंदू राष्ट्र घोषित करू शकू. ही धर्मसभा असली, तरी निवडणुकीच्या दृष्टीनेही आपण याकडे पाहायला हवं. आपले हिंदू कशाप्रकारे विभागले गेले आणि लव जिहादी कसे एकत्र आले. राजकारणावर मला बोलायचं नाहीये. पण राजकारणी नेत्यांशिवाय हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. यावेळी निवडणुकीत जर आपण 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन” असे वक्तव भाजप आमदाराने केले.

अमोल मिटकरींचा पलटवार

आमदार टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यावर महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी टी. राजा सिंह यांना खडेबोल सुनावले आहेत. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर कर टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मिटकरी यांनी लिहिले आहे की, ‘टी. राजा ला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! “ग्लानिर्भवती ” “भारत” हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा.#भारतराष्ट्र’

टी. राजा ला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! “ग्लानिर्भवती ” “भारत” हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा.#भारतराष्ट्र — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 16, 2024

Web Title: If bjp crossed 400 seats in loksabha election india would declared hindu nation mp t raja singh controversial statement nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 02:21 PM

Topics:  

  • BJP
  • loksabha election 2024
  • maharashtra

संबंधित बातम्या

Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…
1

Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात
2

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप
3

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप

महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश; ‘ओरायन’ फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग
4

महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश; ‘ओरायन’ फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.