Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेरा फसवणूक प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन, “रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी सरकार ठाम…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील रेरा फसवणूक प्रकरणात कोणत्याही रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. दोषी बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 26, 2025 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवलीतील रेरा फसवणूक प्रकरणी ६५ बांधकामांतील कोणत्याही रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी खोटे कागदपत्रे सादर करून नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जाईल आणि गरज पडल्यास त्यांना तुरुंगात पाठवले जाईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

…ते आमचे मुसलमान आहेत, त्यांच्यासाठी योजना राबवल्या तर काय; भाजप नेते नितेश राणे नेमकं म्हणाले काय?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले की, या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी नागरिकांची काही चूक नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी सरकारने या फसवणुकीत फसलेल्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ४९९ अनधिकृत बांधकामे समोर आली असून त्यापैकी ५८ बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, ८४ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. याशिवाय, ज्या महापालिका अधिकाऱ्यांनी ८ वर्षांपूर्वी अशा बांधकामांना मंजुरी दिली असेल किंवा त्यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामे उभी राहिली असतील, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

“शासकीय योजना लोभी नव्हे तर…”; दानवेंनी मर्सिडीजवरून डिवचलं अन् फडणवीसांनी सगळचं काढलं, पहा Video

या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळेल आणि कोणीही बेघर होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, दोषी बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने अधिवेशनात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेमुळे फसवणूकग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारने घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे रेरा फसवणुकीत अडकलेल्या नागरिकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सरकार दोषींवर कठोर कारवाई करत असल्याने यापुढे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: In rera fraud case chief minister fadnavis assurance residents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • kalyan dombivali news

संबंधित बातम्या

कल्याण-डोंबिवली परिसरातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक संपन्न
1

कल्याण-डोंबिवली परिसरातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक संपन्न

Manoj Jarange Patil: ‘सहन होतंय तोवर सन्मान करा’, जरांगे पाटलांनी आंदोलकांचे टोचले कान; सरकारलाही दिला पर्याय!
2

Manoj Jarange Patil: ‘सहन होतंय तोवर सन्मान करा’, जरांगे पाटलांनी आंदोलकांचे टोचले कान; सरकारलाही दिला पर्याय!

फडणवीस सरकारचा धमाका! एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती
3

फडणवीस सरकारचा धमाका! एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती

‘एक मराठी माणूस कधी…’ भाषा विवादादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे JNU मध्ये मोठे विधान
4

‘एक मराठी माणूस कधी…’ भाषा विवादादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे JNU मध्ये मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.