Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याला बाजार हस्तक्षेप योजनेत समाविष्ट करा; डॉ. भारती पवार यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिफारस

कांद्याच्या उत्पादनात देशाचा जगात दुसरा, तर देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. चालू वर्षी उत्पादन वाढल्याने त्याचा परिणाम बाजार भावावर होत होऊन दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी मंत्रालयाने बाजार हस्तक्षेप योजना लागू करावी, अशी शिफारस आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2022 | 01:51 PM
कांद्याला बाजार हस्तक्षेप योजनेत समाविष्ट करा; डॉ. भारती पवार यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिफारस
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : कांद्याच्या उत्पादनात देशाचा जगात दुसरा, तर देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. चालू वर्षी उत्पादन वाढल्याने त्याचा परिणाम बाजार भावावर होत होऊन दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी मंत्रालयाने बाजार हस्तक्षेप योजना लागू करावी, अशी शिफारस आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.

दरम्यान सध्या कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र योग्य दर नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी डॉ. पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

भारती पवार नेमकं काय म्हणाल्या?

बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत किमान किमतीत समाविष्ट नसलेल्या बागायती आणि नाशीवंत शेतीमालाला संरक्षण दिले जाते. नाशीवंत मालाच्या किमती घसरतात, अशावेळी सरकारकडून ही योजना लागू केली जाते. राज्य सरकारच्या विनंतीवरून संबंधित मालाचे झालेले नुकसान सामाईक केले जाते. केंद्र आणि राज्य सरकार ५० : ५० टक्के आधार देतात. या योजनेत सफरचंद, किंनू संत्रा, लसूण, गालगल, द्राक्षे, मशरूम, लवंग, काळी मिरी, अननस, आले, लाल मिरची, धणे, इसबगोल, चिकोरी, मोहरी, एरंडेल पाम तेल आदी वस्तूंचा समावेश आहे. यात कांदा पिकाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली.

[read_also content=”खरीपासाठी तब्बल ‘इतक्या’ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा… https://www.navarashtra.com/maharashtra/supply-of-so-many-thousand-quintals-of-seeds-for-kharif-nrdm-289218.html”]

राज्य सरकारने देखील प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावा

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासमवेत डॉ. पवार या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडू नये म्हणून तत्काळ केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिफारस करून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत समाविष्ट पिकांच्या यादीत कांद्याचा समावेश करण्याची मागणी केली आहे. बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या पिकांच्या यादीमध्ये कांद्याचा समावेश करावा. राज्य सरकारला सूचना तसेच आवश्यक निर्देश करावेत, अशी मागणी डॉ. पवार केली आहे. राज्य सरकारने देखील योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ केंद्र शासनास सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Include onions in the market intervention plan dr bharti pawars recommendation to union agriculture minister nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2022 | 01:46 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse
  • cmomaharashtra
  • narendra modi
  • Nashik News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Narendra Modi: “काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे”, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल
1

Narendra Modi: “काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे”, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Bhaskar Jadhav : “मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न” जाधवांचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
2

Bhaskar Jadhav : “मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न” जाधवांचा विनायक राऊतांवर हल्लाबोल

Nashik : तपोवन झाडतोडीचा मुद्दा तापला, सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका
3

Nashik : तपोवन झाडतोडीचा मुद्दा तापला, सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका

Raj Thackeray News: साधुंच्या नावाखाली लाडक्या उद्योगपतींच्या घशात जमीन;तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
4

Raj Thackeray News: साधुंच्या नावाखाली लाडक्या उद्योगपतींच्या घशात जमीन;तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.