Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कुणी घर देता का घर ?”; उपमुख्यमंत्र्यांचा जिव्हाळा फक्त कल्याण डोंबिवलीपुरताच आहे का ? जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

ठाणे आणि इतरत्र परिसरातील जुन्या इमारती आणि अनधिकृत असलेल्या वस्तींबाबतचा मुद्दा दिवसेंदिवस संवदेनशील होत चालला आहे. या सर्वसामान्य बेघर नागरिकांच्या हक्काच्या निवाऱ्याबाबत योग्य तो तोडगा निघण्यास विलंब होतआहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 21, 2025 | 02:09 PM
“कुणी घर देता का घर ?”; उपमुख्यमंत्र्यांचा जिव्हाळा फक्त कल्याण डोंबिवलीपुरताच आहे का ? जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल
Follow Us
Close
Follow Us:
  • अनधिकृत असलेल्या वस्तींबाबतचा मुद्दा संवदेनशील
  • जितेंद्र आव्हाड यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेेवर सणकून टीका
  • उपमुख्यमंत्र्यांचा जिव्हाळा फक्त कल्याण डोंबिवलीपुरताच आहे का ?
 

ठाणे/स्नेहा काकडे,जाधव :  ठाणे आणि इतरत्र परिसरातील जुन्या इमारती आणि अनधिकृत असलेल्या वस्तींबाबतचा मुद्दा दिवसेंदिवस संवदेनशील होत चालला आहे. या सर्वसामान्य बेघर नागरिकांच्या हक्काच्या निवाऱ्याबाबत योग्य तो तोडगा निघण्यास विलंब होतआहे. याच समस्येवर आता जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलाच टोला लगावला आहे.

आव्हाड म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण – डोंबिवलीतील इमारती वाचवाव्या लागतील, असे विधान केले आहे. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे. त्याबद्दल कौतूकच आहे. मात्र, अनाथांचे नाथ अशी ओळख सांगणाऱ्यांचे ममत्व कल्याण- डोंबिवलीपुरतेच मर्यादित आहे का? कळवा, मुंब्रा, शिव, दिवा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या भयाने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.

‘संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली’; राज्यातील ‘या’ कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप

डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाणे विभागातील  शिळ, मुंब्रा, दिवा भागात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना नोटीसा देऊन घरे खाली करण्यास सांगितले जात आहे. कारवाई लगेच होत नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरविली जात आहे. अशा स्थितीत नागरिकांचा निवारा वाचविण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता कळव्यातील 52 इमारतींना नोटीस बजावण्याची कार्यवाही केली जात आहे. येथील लोकांनी रहायचे कुठे? म्हणूनच कल्याण – डोंबिवलीतील नागरिकांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचे आपणाला कौतूक वाटते. पण, कल्याण-डोंबिवलीबद्दल हे सर्व बोलत असताना, कळवा-मुंब्रा-दिवा येथील नागरिकांचे काय? येथील अनेक इमारतींना न्यायालयीन लढाईमुळे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसांमुळे नागरिक घाबरलेले आहेत, अशात त्यांना दिलासा देणे, ही सरकारची जबाबदारी आहे.

एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याण- डोंबिवलीत जाहीरपणे घेतली, तशीच भूमिका कळवा-मुंब्रा-दिवा येथील नागरिकांबद्दल घ्यावी. आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला आम्ही तयारच आहोत. मात्र, न्यायालयाला काय उत्तरे द्यायची, ही जबाबदारी सरकारची आहे.

अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. अधिकाऱ्यांवर, बिल्डर्सवर कारवाई होत नाही; मात्र, गोरगरीब लोकांना बेघर केले जात आहे. जेव्हा ठाण्यात इमारती पाडल्या जाणार होत्या. तेव्हा आघाडी सरकार सत्तेत होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी ‘एकही इमारत पडू देणार नाही,” असा शब्द दिला होता. त्यानुसार कारवाई होऊ दिली नव्हती. एकनाथ शिंदे यांनीही तशीच भूमिका घ्याल, अशी अपेक्षाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

‘गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा घराबाहेर पडू देणार नाही’; शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

कळवावासियांना गुडघ्यावर आणण्याचा डाव

क्लस्टर योजना नागरिकांना नको आहे. नागरिकांना स्वयंविकास करायचा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना क्लस्टर डेव्हलपमेंट करायची असल्याने पाणी टंचाई निर्माण करून कळवेकरांना गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जे “चिटर” बिल्डर आहेत. त्यांनाच पुढे केले जात आहे. क्लस्टरच्या जबरदस्तीसाठी नागरी सुविधांचा तुटवडा करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असा आरोपही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जमील शेख फेरचौकशी कुठे अडली?

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी जमील शेख हत्याकांडाची फेरचौकशी करण्याची घोषणा केली होती. कुठे आहे फेरचौकशी? आजही दुसरा आरोपी मोकाट फिरत आहे. जमीलचे कुटुंबिय मुस्लीम आहे म्हणून की संशयित राजकीय पुढारी म्हणून फेरचौकशी रखडली आहे. जमीलच्या मुली हुशार आहेत. बापाचे छत्र हरवल्यानंतर त्या गरिबीत आपले शिक्षण घेत आहेत. त्यांना न्याय देण्याचे आश्वासन देऊन आज 54 दिवस उलटून गेले आहेत. म्हणूनच आपण मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की, जमीलच्या कुटुंबियांना न्याय द्या, अशी मागणी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हे राज्य गावगुंडांच्या हातात गेलेय

त्र्यंबकेश्वर येथे काही गावगुंडांनी पत्रकारांना मारहाण केली आहे. या घटनेकडे पाहता, हे राज्य गावगुंडांच्या हातात गेले आहे. गुंडांना कोणाचीच भीती राहिलेली नाही. नव्याने उदयास आलेल्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राला लांच्छन लागले आहे. लोकशाहीत चार स्तंभ असतात. मात्र, हे चारही स्तंभ आता हलू लागले आहेत. परिणामी लोकशाही निष्प्रभ होत आहे. पोलीसही निवडक लोकांच्यासाठी काम करीत आहे. हे आदेशांचे राज्य आहे, अशी टीका डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली. बीडमधील गोट्या गित्ते हा रिव्हॉल्व्हर नाचवत व्हिडिओ प्रसारीत करतो. आपणालाही धमकी देतो. तो तर सरकारचा जावई झाला आहे. नशिब त्या वाल्मिक कराडला सोडला नाही, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Web Title: Is the deputy chief ministers interest only in kalyan dombivali jitendra awhads criticism of eknath shinde about illigal residency problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • jitendra avhad
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane :  ठाण्याला मिळणार 48 हजार लिटर केरोसीनचा वाटा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
1

Thane : ठाण्याला मिळणार 48 हजार लिटर केरोसीनचा वाटा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Nanded News : धोंडगेंचा प्रवेश कलाटणी देणारा…; नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
2

Nanded News : धोंडगेंचा प्रवेश कलाटणी देणारा…; नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन
3

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन

Thane News : इंधनदरवाढीमुळे भाजीपाला महाग; सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय?
4

Thane News : इंधनदरवाढीमुळे भाजीपाला महाग; सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.