
aditya education
देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असून, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत कौशल्य, शिस्त आणि मेहनतीची कास धरावी, असे प्रतिपादन आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक शिक्षणमहर्षी सुभाषचंद्र सारडा यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व आणि देशाच्या उभारणीत तरुणाईची भूमिका याविषयी विचार मांडले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी यांनी केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा त्यांनी आढावा घेतला. अद्ययावत क्रीडांगणामुळे विविध स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदित्य दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरणासाठी निवड झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सोए, गिरीश गिल्डा, मुख्य प्रशासकीय अधिकारी संतोष लहाने, संचालिका डॉ. आदिती सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, अंजली पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. हिमांशू श्रीवास्तव यांनी केले. आभार प्राचार्य बालाजी बहिरवाल यांनी मानले.