Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सध्या मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा, मराठा समाजाच्या पाठीशी जनतेला उभं करावं”; प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर जरांगे पाटलांचे प्रत्त्युत्तर

  • By युवराज भगत
Updated On: Jan 20, 2024 | 04:50 PM
“सध्या मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा, मराठा समाजाच्या पाठीशी जनतेला उभं करावं”; प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर जरांगे पाटलांचे प्रत्त्युत्तर
Follow Us
Close
Follow Us:

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून ‘चलो मुंबई’ चा नारा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा केली होती. आज मनोज जरांगे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. असे असताना प्रकाश आंबडेकरांनी त्यांना मराठा आरक्षणाबरोबरच लोकसभेला राजकीय भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“सत्ताधाऱ्यांच्या वतीने आमदार बच्चू कडू यांना मध्यस्थीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले. मात्र, तोडगा निघू शकला नाही. मनोज जरांगे-पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने सरकारचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. त्यांनी केवळ पाठिंबा देण्यापुरतेस मर्यादित न राहता निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. ते सहज लोकसभेत पोहोचू शकतील. मराठा आरक्षणासाठी आंदोलनासोबतच त्यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे. याचा गांभीर्याने विचार त्यांनी करायला हवा,” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं.

सत्ताधाऱ्यांचे केवळ वेळकाढू धोरण

राज्यातील सत्ताधारी मनोज जरांगे-पाटील यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत आहेत. सत्ताधाऱ्यांचे केवळ वेळकाढू धोरण असून एकदा निवडणुका झाल्यावर हे आंदोलन चिरडण्यात येईल. त्यामुळे जरांगे-पाटलांनी आंदोलनासह राजकीय भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. यावर मनोज जरांगे-पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

“मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा”
यावर जरांगे-पाटील म्हणाले, “प्रकाश आंबेडकर सत्य आणि निर्भिड बोलतात म्हणून मी त्यांचे सल्ले मानतो. पण, सध्या मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे. मराठ्यांच्या मुलांना आरक्षण देणं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या पाठीशी जनतेला उभं करावं.”

“मराठा आरक्षण मिळवणारच”
“महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्र्यांनीही मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहावं. सत्ताधारी आणि विरोध मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीतर आम्ही लढण्यास सज्ज आहोत. आरक्षण मिळवणारच,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.

“…तर मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळालं नसतं”
“मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठे आणि मराठेच दिसणार आहेत. प्रत्येकानं राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करून घेतला आहे. मात्र, गोरगरीब तरूणांसाठी कुणीही समोर येण्यास तयार नाही. ५४ लाख नोंदी सापडूनही सरकार आरक्षण देत नाही. ही घोर फसवणूक आहे. काहीच पुरावे नसते, तर मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळालं नसतं. नुसते मोर्चे आणि आंदोलनच करत राहिलो असतो,” असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं.

Web Title: Jarange patils reply to prakash ambedkars advice they said at present maratha reservation is a burning issue people should stand behind maratha community nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • president of Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.