कोथळी गडावरील पुरातन वस्तूंना नवी झळाळी, सह्याद्री प्रतिष्ठानचा प्रयत्न
कर्जत : कोथळीगड हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला कर्जतच्या पूर्वेला, नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आहे. हा किल्ला एका सुळक्यावर आहे आणि त्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील किल्ले कोथळीगड तथा पेठ किल्ला येथे सह्याद्री प्रतिष्ठान कडून श्रमदान करण्यात आले.पावसाळा सुरू होत असताना लोखंडाचे स्वरूपातील शिवकालीन वस्तू यांना गंज लागू नये यासाठी त्यांना रंग लावण्यात आले. त्यामुळे किल्ल्यावरील पुरतान वस्तूंना नवीन झळाळी मिळाली आहे.
कर्जतजवळील आंबिवली गावानजीक असलेला पेठचा किल्ला नेहमीच ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा विषय असतो. इतिहासाशी नाळ जुळवणाऱ्या या गडाचे शिवकालीन महत्त्वही मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या या किल्ल्याचे निर्मिती स्वराज्यातील महत्व ओळखून केली होती.स्वराज्यात या किल्याचा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी विशेष वापर केला जात होता. मात्र त्याच काळात फितुरीमुळे गडाची अंमलबजावणी मुघलांच्या हातात गेली होती.त्यानंतर अडगळीत पडलेल्या या किल्ल्याची दुरावस्था झाली.सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाच्या वतीने किल्ले कोथळीगड (पेठचा किल्ला) येथे शाकारर्णी मोहीम घेण्यात आली. किल्ल्याच्या संवर्धनासाठी गेली अनेक वर्षे सह्याद्री प्रतिष्ठान कडून कार्य केले जात असून स्थानिक दुर्गसेवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाच्या वतीने किल्ले कोथळीगडावर (पेठचा किल्ला) वरील पुरातन वस्तू यांचे नुकसान पावसामुळे होऊ नये म्हणून किल्ल्याची शाकारणी मोहीम राबविण्यात आली.
या गडस्वच्छता मोहिमेत कर्जत कोथळीगड (पेठचा किल्ला) वरील तोफगाडे, महादरवाजा यांची स्वच्छता करून त्यांना वॉर्निश रंगकाम करण्यात आले. भविष्यात गडावर सौरऊर्जा आधारित पथदिवे, अपघातप्रवण भागात रेलिंग, तसेच तोफगाड्यांसाठी छप्पर लावण्याचा मानस प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी प्रयत्न आहे.दरवर्षी पावसामुळे दरड कोसळलेल्या ठिकाणी लवकरच दिशादर्शक फलकही लावण्यात येणार आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेचे आहे.कोथळीगड हा पेठचा किल्ला म्हणून ओळखला जातो त्याचे कारण त्याच्या पायथ्याशी पेठ गाव वसलेले आहे. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठी आहे.