
Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली
परिणामी हिरव्या रंगाचे केमिकलयुक्त पाणी थेट रस्त्यावर वाहत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे हजारो कामगार, शाळकरी विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना रोज जीव मुठीत धरून या केमिकलयुक्त पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही कार्यालयात जाण्यासाठी या दूषित पाण्यातून चालत जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
औद्योगिक वसाहतीतील नालेसफाईच्या कामावर लाखो रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना केमिकलयुक्त पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने एमआयडीसी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.
या संदर्भात एमआयडीसीचे उपअभियंता निशिकांत गीतेंशी संपर्क साधला असता सांगितले, “यावर्षी नालेसफाईची कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी गटारांची कामे सुरू असल्याने किंवा काही भागात किरकोळ कामे बाकी असू शकतात. अशा ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती नालेसफाई व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल.”
अनेक उद्योगांच्या अधिकाऱ्याऱ्यांनीही यंदाची नालेसफाई समाधानकारक न झाल्याची कबुली दिली आहे. काही ठिकाणी नाल्यातील गाळ बाहेर काढून तो नाल्याच्या कडेलाच टाकण्यात आला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे तोच गाळ पुन्हा नाल्यात वाहून गेल्याने संपूर्ण नालेसफाई केवळ कागदोपत्रीच झाल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून संबंधित ठेकेदाराचे बिल चौकशी पूर्ण होईपर्यंत अदा करू नये, अशी मागणी आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. – सचिन मोरे, धाटाव विभाग अध्यक्ष, भाजप