
केंद्र शासनाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी डिजिटल प्रणालीमध्ये खत साठा व्यवस्थापन आणि शेतकरी माहिती तंत्रज्ञानाचे यशस्वी एकत्रीकरण करण्यात आले आहे. या आधुनिक सुविधेमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या मोबाईलवरील सुविधेद्वारे त्यांच्या परिसरातील अधिकृत खत विक्री केंद्रांवर नेमका किती खतसाठा उपलब्ध आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे.
अनेकदा खरीप हंगामात खतांच्या टंचाईची अफवा पसरवून किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जाते. नवीन ऑनलाइन नोंदणी प्रणालीमुळे रांगांमधून पूर्णपणे मुक्ती होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाजारात काही व्यापा-यांकडून मुख्य खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने किवा दुय्यम दर्जाची खते खरेदी करण्याची सक्ती केली जाते. या ऑनलाइन नोंदणी सुविधेमुळे व्यापाऱ्यांची अशी मनमानी आणि सक्ती मोडून काढण्यास मोठी मदत होणार असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल.
Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ
८ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या नवीन डिजिटल खत वितरण प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, मोबाईल आधारित ऑनलाइन खत नोंदणी सुविधेचा वापर करून आपला वेळ आणि श्रम वाचवावा. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावी व जिल्ह्यात एक पारदर्शक खत वितरण व्यवस्था निर्माण करण्यासाठी कृषी विभागाला पूर्ण सहकार्य करावे. जालिंदर पांगिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
या प्रणालीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतक-यांना आता मोबाईलद्वारे आवश्यक असलेल्या खताची आगाऊ नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी केल्यानंतर एक विशेष सांकेतिक कोड (क्यूआर कोड) तयार होईल, शेतकऱ्यांनी मोबाईलवर केलेले हे आरक्षण पुढील तीन दिवसांसाठी वैध राहील, या तीन दिवसांच्या कालावधीत शेतकरी आपल्या सवडीनुसार आणि सोयीनुसार संबंधित खत विक्रेत्याकडे जाऊन आपल्या हक्काचे खत खरेदी करू शकतील, ज्यामुळे खत खरेदीची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत होणार आहे.
Gokul Dudh Sangha बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; सत्ताधारी गटाला मोठा दिलासा