Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam: “अलमट्टी धरणाची ऊंची वाढवल्याने…”; आमदार राजेश क्षीरसागर नेमके काय म्हणाले?

पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2025 | 05:13 PM
Almatti Dam: “अलमट्टी धरणाची ऊंची वाढवल्याने…”; आमदार राजेश क्षीरसागर नेमके काय म्हणाले?
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: आज शिसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदघेऊन अनेक विषयांवर भाष्य केले आहे. गांधी मैदानावरून त्यांनी टीका केली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे गांधी मैदानसाठी मी 5 कोटी मंजूर करून आणले, होते असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. आमदार राजेश क्षीरसागर नेमके काय म्हणाले हे जाणून घेऊयात.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “नाल्यात गादी, पोती टाकून पाणी थांबवण्याचे घाणेरडे राजकारण ज्या पद्धतीने करण्यात आले त्याचा मि निषेध करतो. कोल्हापूर महापालिका आणि पोलीस प्रशासनाला कारवाई आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. काही समाजकंटकाकडून गाद्या आणि पोती टाकून पाणी थांबवण्यात आले आहे. घाणेरडे राजकारण करण्याला देखील मर्यादा हव्यात.”

पुढे बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पाच कोटीचा निधी दिला होता. मात्र चांगल्या गोष्टींना विरोध करायचा यासाठी नाला गाद्या आणि पोती टाकून अडवण्यात आला.त्यानंतर निधी चुकीचा वापरला जात आहे अशी टीका करायची.”

अलमट्टी प्रकरणावर काय म्हणाले राजेश क्षीरसागर? 

महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन्ही राज्य एकाच देशाचा भाग आहे. अलमट्टी धरणाची ऊंची वाढवल्याने महाराष्ट्रातील गावांचे नुकसान होणार असेल तर कर्नाटक सरकारने विचार केला पाहिजे.

अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ कुर्डूवाडी पालिका चौकात शेतकरी नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला अलमट्टी धरण उंची वाढीला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.

Almatti Dam: अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात शेतकरी-नागरिक आक्रमक; कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला

अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध वाढला

पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात  महापूरची स्थिति निर्माण होते. त्याला कर्नाटक सरकार जबाबदार आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो. सध्या या धरणाची ऊंची ५१९ मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेवर आक्षेप

अलमट्टीच्या उंची वाढवण्याबाबत कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेवर आक्षेप घेऊन महायुती सरकारने एकप्रकारे त्याला मूक संमती दिल्याचे चित्र होते. मात्र ५ मीटरने अलमट्टीची उंची वाढवल्यास पाणी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे  महाराष्ट्र सरकार अभ्यासाच्या भूमिकेतून बाहेर येऊन कर्नाटकच्या निर्णयाला विरोध करणार की सांगली-कोल्हापूरला पुराच्या खाईत लोटणाऱ्या निर्णयाचे मूक साक्षीदार बनणार होते, असे चित्र निर्माण झाले होते.

Web Title: Shivsena mla rajesh kshirsagar criticizes to karnataka government about almatti dam case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • kolhapur
  • kolhapur news
  • Rajesh Kshirsagar

संबंधित बातम्या

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल
1

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
2

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
3

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प
4

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.