
प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बसप्रवास
बुधवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार केएमटी प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अतिग्रे यांनी प्रत्यक्ष बस प्रवास केला. तसेच केएमटी कार्यालयास कामकाजाची पाहणी केली. भेट देवून कामकाजाची पाहणी केली.
लवकरच परिवहन विभागाची बैठक
सर्व मागण्याबाबत आ.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच परिवहन विभागाची सर्वसमावेशक बैठक आयोजित करून या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
अत्याधुनिक ५० बसेसची आहे आवश्यकता
केएमटी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना जाणवणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने चालक नसल्यामुळे १७ बसेस बंद अवस्थेत आहेत. प्रवासी संख्या अधिक असल्याने अत्याधुनिक ५० बसेसची आवश्यकता आहे. सफाई कर्मचारी यांची संख्या कमी आहे. चालक आणि वाहक भरती करणे आवश्यक आहे. कार्यालयांची डागडुजी करणे आवश्यक आहे. या प्रमुख बाबींकडे लक्ष देण्याची – आवश्यकता असल्याचे सांगितले. याबाबतीत परिवहन विभागाकडून आवश्यक – मागणी प्रस्ताव देण्यासाठी पाठपुरावा करून हे प्रश्नही मार्गी लावण्यास सर्वतोपरी – प्रयत्न करू तसेच ‘केएमटी’चे उत्पन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि दीर्घकालीन सुधारणांवर भर देवू, अशी ग्वाही दिली.‘