Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, 'कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत शहरवासीयांची फसवणूक झाली असून, येत्या निवडणुकीत मतदार त्याचा बदला घेतील,' असा घणाघात केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 20, 2025 | 03:06 PM
Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय
  • शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?
  • निर्णय लाबवून शहर विकासापासून वंचित
दीपक घाटगे/ कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होणार असून, या निवडणुकीत हद्दवाढ आणि रस्त्यांचा दर्जा हे दोन प्रमुख मुद्दे केंद्रस्थानी राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, ‘कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत शहरवासीयांची फसवणूक झाली असून, येत्या निवडणुकीत मतदार त्याचा बदला घेतील,’ असा घणाघात केला आहे.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा गेल्या अनेकवर्षांपासून चर्चेचा विषय आहे. वाढत्यालोकसंख्येचा ताण, पायाभूत सुविधांचीगरज आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी हद्दवाढ अपरिहार्यअसल्याचे मत वारंवार व्यक्तहोतआहे. मात्र,महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादीकाँग्रेस (शरद पवार आणि शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) यांनी आरोप केलाआहे.

Karad News : कर्मचाऱ्यांकडून नियमित निरीक्षण; कुंपण ओलांडून ‘तारा’चा चांदोली जंगलात मुक्तसंचार

महायुती सरकारने हद्दवाढीच्यामुद्द्यावर केवळ आश्वासनांची खैरातकेली; प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस पावलेउचलली नाहीत. यामुळे शहराचानियोजनबद्ध विकास खुंटला असून, नागरी ‘कोल्हापूर शहर हद्दवाढीचा निर्णय लाबवून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले. नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांतील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या सर्व बाबी रखडल्या, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्याऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वासही महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.

‘कोल्हापूर शहर हद्दवाढीचा निर्णय लांबवून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले. नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांतील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या सर्व बाबी रखडल्या, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वासही महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.

Local Body Election: आचारसंहिता जाहीर होताच इच्छुकांची धावपळ सुरू; कोल्हापर, इचलकरंजी महापालिका निवडणुकीला येणार रंगत

वाहतूक कोंडीने त्रस्त

दरम्यान, शहरातील रस्त्यांचा दर्जा हा देखील कळीचा मुद्दा ठरत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड़े निकृष्ट कामामुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. विरोधकांनी यावरून महायुती सरकारसह महापालिकेतील सत्ताधाऱ्याऱ्यांना जबाबदार धरले आहे. रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, त्याचा फटका थेट नागरिकांच्या सुरक्षिततेला बसत आहे.” असा आरोप करण्यात आला आहे.

सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा मांडणार

महाविकास आघाडीने निवडणूक प्रचारात या दोन्ही मुहयांवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांच्या वतीने संयुक्तपणे प्रचाराची रणनीती आखली जात असून, जनतेपर्यंत सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. येत्या काळात सभांमधून, प्रचारफेऱ्यांतून आणि समाजमाध्यमांद्वारे आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. एकूणच, निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, हद्दवाढ, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर जनतेचा कौल ठरणार आहे. वाढत्या राजकीय तापमानामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक का चर्चेत आहे?

    Ans: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. हद्दवाढ आणि रस्त्यांचा दर्जा हे प्रमुख मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत.

  • Que: कोल्हापूर शहर हद्दवाढीचा मुद्दा नेमका काय आहे?

    Ans: वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांची गरज आणि नियोजनबद्ध विकासासाठी शहर हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र हा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून अद्याप ठोस अंमलबजावणी झालेली नाही.

  • Que: महाविकास आघाडीने हद्दवाढीवर काय आरोप केले आहेत?

    Ans: महाविकास आघाडीने आरोप केला आहे की, महायुती सरकारने हद्दवाढीबाबत फक्त आश्वासने दिली, प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे.

Web Title: Will the quality of roads in city become a cause for controversy in the backdrop of the municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Maharashtra Politics
  • muncipal corporation
  • political news

संबंधित बातम्या

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?
1

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग
2

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख
3

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांची धुरा; पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही सुपूर्द
4

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांची धुरा; पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही सुपूर्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.