
मोठी बातमी ! जायकवाडी भूसंपादनात 241 कोटींचा गैरव्यवहार; माजी जिल्हाधिकाऱ्याला अटक
लातूर : प्रशासकीय कार्यशैलीवरून आधीच वादात सापडलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी एका भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी लातूर येथे अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी असताना भूसंपादन भरपाईच्या वितरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप अविनाश पाठक यांच्यावर आहे.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान स्थापन केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालात गंभीर अनियमितता उघड झाली आहे. अहवालानुसार, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान १५४ प्रकरणांमध्ये फसवणुकीचे आदेश जारी आधारे कवाजात आलकोटा आदेशाखा या वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.
तपासात असेही उघड झाले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ (छत्रपती संभाजीनगर परिसर) मधून अंदाजे ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आणि वितरित करण्यात आले, ज्यामुळे ७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, संबंधित आदेशांसाठी कोणतीही नोंदवही किंवा रेकॉर्ड रीतसर ठेवण्यात आले नव्हते. १७ एप्रिल, २०२५ या एकाच दिवशी, कोणत्याही पक्षाच्या उपस्थितीशिवाय किंवा स्वाक्षरीशिवाय अनेक आदेश पारित करण्यात आले, ज्यामुळे गंभीर संशय निर्माण झाला आहे.
आरोपांच्या पार्श्वभूमीवर निलंबनानंतर अटक
बीडहून बदली झाल्यानंतर अविनाश पाठक यांची मुंबईत मत्स्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; परंतु आरोपांमुळे राज्य सरकारने त्यांना निलंबित केले. त्यांनी यापूर्वी लातूरमध्ये निवासी उपविभागीय दंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले होते.
बीड पोलिसांचे विशेष पथक
बीड पोलिसांचे एक विशेष पथक गुरुवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाले आणि गांधी चौक परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना औपचारिक अटक करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.