Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्षफुटीनंतर नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात; बळीराजाला न्याय कसा मिळणार?

सामान्य जनतेसाठी व शेतकरी वर्गासाठी लढणाऱ्या संघटनातील नेते बाहेर पडल्याने नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2025 | 11:27 AM
पक्षफुटीनंतर नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात; बळीराजाला न्याय कसा मिळणार?

पक्षफुटीनंतर नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात; बळीराजाला न्याय कसा मिळणार?

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर/ दीपक घाटगे : जोडा, तोडा, मोडा, आपला पक्ष वाढवा, अशी भूमिका घेतलेल्या भाजपने स्थानिक, प्रादेशिक पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडून पक्ष वाढवण्याचे धोरण आखल्यामुळे स्वार्थी नेते, कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला जाऊन उभा राहू लागले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेसाठी व शेतकरी वर्गासाठी लढणाऱ्या संघटनातील नेते बाहेर पडल्याने नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे पक्ष कार्यरत होते. या सर्वच पक्षांच्या झेंड्याखाली काम करीत अनेक जण मोठे झाले. मात्र कालांतराने हेच नेते आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे मूळ पक्षाला सोडून अन्य पक्षात निघून गेले. त्यामुळे पक्षाचा प्रमुख संस्थापक अथवा नेता एकला चलो रे…अशी भूमिका घेऊन आज वाटचाल करत आहेत. याबाबत बोलायचे झाले तर नुकतेच शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेले शहर प्रमुख हर्षल सुर्वे दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करण्यास जमणार नाही, अशी भूमिका घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत दाखल झाले आहेत. तर यापूर्वी सुद्धा शिवसेनेची आमदार अशी ओळख असलेले राजेश क्षीरसागर सुद्धा पक्ष सोडून गेले आहेत.

मूळ पक्ष साेडून अन्य पक्षात उडी

काँग्रेस पक्षातून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक शारंगधर देशमुख यांच्यासह अन्य नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम केला. यातून सतेज पाटील यांना जिल्ह्यात एकाकी पाडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा अशीच पडझड झाली असून, अनेकांनी स्वार्थापोटी मूळ पक्ष सोडून अन्य पक्षात उड्या मारल्या आहेत, तर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा खाली ठेवला आहे.

स्वाभीमानीचे नेते भाजपच्या मांडवात

शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा, म्हणून निर्माण झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उगम शिरोळ तालुक्यातून झाला. त्यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, आमदार सदाभाऊ खोत, सावकर मादनाईक, जालंदर पाटील, राजेंद्र गडण्यावार, भगवान काटे, शिवाजी माने आदी कार्यरत होते. या पक्षाचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतीमालाला भाव मिळावा, यासाठी जोरदार आंदोलने केली. त्यामुळे ऊसाला योग्य दर मिळाला, मात्र कालांतराने या संघटनेत फूट पाडून भाजपने नेत्यांना आपल्याकडे खेचले. आज सावकर मादनाईक भाजपमध्ये गेले असली तरी शेतकऱ्यांच्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते अन्य पक्षाच्या रिंगणात गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची असलेली चळवळ भविष्यात टिकून राहणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

स्वार्थी राजकारण कधी संपणार?

शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, यासाठी शेट्टी यांनी नुकतेच राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. या आंदोलनाचे फलित मिळो अथवा न मिळो मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. पक्षात कार्यकर्ता नेता होतो, नेता झाला की कॉलर ताट होते. आणि त्याला सत्तेची स्वप्ने पडू लागतात. मात्र ज्या ठिकाणी आपण काम केले त्या पक्षाचा त्यांना विसर पडतो आणि जय महाराष्ट्र करत अन्य पक्षात जातात. यालाच म्हणतात राजनीती आणि स्वार्थी राजकारण हे कधी संपणार आहे.

Web Title: Leaders in the organization in kolhapur district are leaving the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • kolhapur
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप? हसन मुश्रीफांना मोठा धक्का; नेमका विषय काय?
1

Maharashtra Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप? हसन मुश्रीफांना मोठा धक्का; नेमका विषय काय?

राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
2

राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली
3

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
4

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.