Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीत कमी ओलावा, रब्बी हंगाम संकटात; आंबेगाव तालुक्यात पेरणी क्षेत्र घटणार?

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी रब्बी हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2023 | 03:05 PM
जमिनीत कमी ओलावा, रब्बी हंगाम संकटात; आंबेगाव तालुक्यात पेरणी क्षेत्र घटणार?
Follow Us
Close
Follow Us:

रांजणी : मान्सूनचा पाऊस वेळेत न पडल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील खरीप पिकाला फटका बसला. त्यात अपुरा पाणीसाठा आणि तीव्र ऑक्टोबर हिटमुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी तालुक्यातील रब्बी हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच

आंबेगाव तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात पाऊस वेळेवर पडला नाही. त्यामुळे खरीप हंगाम लांबला. कोरडवाहू पेरणी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम जमिनीत कमी ओलावा असल्याने संकटात येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान यंदा अपेक्षित न पडलेला पाऊस जलसाठ्यांची दयनीय अवस्था, उपशावर असलेल्या विहिरी, बोअरवेल आणि ओलावा नसलेल्या जमिनी यामुळे तालुक्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच आहे. एखादा अवकाळी पाऊस जर झाला नाही तर रब्बी पिकाच्या पेरणी सोबतच फळबागांवर संकटाची कुऱ्हाड पुन्हा एकदा कोसळणार आहे.

मान्सून परतल्यानंतर तालुक्याच्या बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान झाले आहे. हस्त नक्षत्राचा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस बरसला मात्र आता स्वाती नक्षत्रात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी ही परिस्थिती नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर हिटचा चटका वाढल्याने तालुक्यात उन्हाची ताप वाढली आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे.

गहू, हरभरा क्षेत्र घटण्याची दाट शक्यता

मुळातच चालू वर्षी कमी प्रमाणात पाऊस बरसला, त्यामुळे भूपृष्ठावरील सिंचन स्रोत्र नाही. पुरेसे पाणी नाही दुसरीकडे वाढते तापमान जमिनीतील ओलावा नाहीसा करत आहे. तापमान आतापासूनच ३५° सी च्या पुढे जात आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो आहे. परिणामी यंदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा क्षेत्र घटण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यात कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारीचा पेरा करण्याशिवाय पर्याय नसून हे पीक देखील कितपत हाती लागते याविषयी शंका आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. डिंभे धरणात पाणी उपलब्ध असल्यामुळे धरणातील पाणी शेतकऱ्यांना भविष्यकाळात वरदाण ठरू शकते. वास्तविक चालू वर्षीचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा कठीण आहे. पाण्याच्या खोल चाललेल्या पाणी पातळीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम आता रब्बीच्या पेरण्यांवरही होऊ पाहत आहे. पावसाअभावी पुरेशा प्रमाणात जमिनीत ओल नसल्याने रब्बी हंगामातील काही भागातील पेरण्या देखील रखडल्या आहेत.

Web Title: Low soil moisture rabi season in crisis sowing area will decrease in ambegaon taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 03:05 PM

Topics:  

  • Ambegaon
  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.