
राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
राज्याच्या नाममात्र उत्पन्नात १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असली तरी त्या तुलनेत महसूलवाढ साधण्यात सरकारला यश आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, याचा परिणाम सामाजिक क्षेत्रातील एकूण तरतुदींवर दिसून येतो. सामाजिक क्षेत्रासाठीची तरतूद २,८९,६७१ कोटी रुपयांवरून २,६८,४६० कोटी रुपयांवर आली आहे.
पोषण क्षेत्रातील तरतूद ४५ टक्क्यांनी कमी
महिला कल्याणातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या तरतुदीतही घट झाली असून ती ३०,६१९ कोटी रुपयांवरून २१,००० कोटी रुपयांवर आली आहे. पोषण क्षेत्रातील तरतूद ४५ टक्क्यांनी कमी होऊन ५,८५१ कोटी रुपयांवरून ३,१९९ कोटी रुपये झाली आहे. ग्रामीण विकासासाठीचा निधीही ३५,८१५ कोटी रुपयांवरून ३४,०१० कोटी रुपये इतका कमी झाला आहे. आरोग्य क्षेत्रातही निधीत घट झाल्याचे दुग्गल यांनी सांगत मागील वर्षाच्या सुधारित अंदाजातील ३८.४५५ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा आरोग्य क्षेत्रासाठी ३३.६५४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून ती सुमारे १२.५ टक्क्यांनी कमी आहे.
काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.