Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी जमा केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे निधी हस्तांतरित केला.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 04:13 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटींचा पहिला हप्ता जमा
  • आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना थेट लाभ
  • कर्जमुक्त शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज देण्याचे बँकांना निर्देश
 

राज्यातील शेतकरीवर्गाला अतिशय आनंदाची बातमी असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये पाठवली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, त्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती नियमित करण्यात आली असून, अनेकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

राज्यातील 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी जमा

राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. या टप्प्यात राज्यातील 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये एकूण 5,029 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारने यानंतर सर्व राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती आणि सहकारी बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शेतीची कामे आर्थिक अडचणीशिवाय सुरू राहतील, असे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.

‘रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका’; ‘सावजी’वरून बावनकुळे आक्रमक

याशिवाय, पहिल्या यादीतील ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्याही कर्जखात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अत्यंत सोप्या प्रक्रियेद्वारे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नसून, केवळ आधार प्रमाणीकरणाद्वारे लाभ दिला जात आहे. ग्रामपंचायतींकडे लाभार्थ्यांच्या याद्या पाठविण्यात आल्या असून, पात्र शेतकऱ्यांची कर्जखाती थेट शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बँकांनी एनपीए खात्यांवरील व्याज माफ केल्यामुळे शासनाकडून जमा झालेली रक्कम आणि कर्जाची थकबाकी यामध्ये तफावत राहिलेली नाही. त्यामुळे संबंधित कर्जखाती पूर्णपणे निकाली निघाली आहेत. तसेच, सुमारे 12 लाख कर्जखाती तपासणीदरम्यान त्रुटींसह आढळल्याने ती संबंधित बँकांकडे दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आली आहेत. बँकांनी आवश्यक सुधारणा करून ही माहिती पुन्हा सादर केल्यानंतर त्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Ratnagiri News: ‘गोरगरीबांना १०-१० फेऱ्या कशासाठी?’ बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल; महसूल यंत्रणेची खरडपट्टी

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Maharashtra farmer loan waiver first installment devendra fadnavis 5029 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmer Loan Waiver
  • Farmers Issues
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका’; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल
1

Manoj Jarange Patil: ‘तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका’; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल

Mira Bhayandar: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले; १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट, सक्तीच्या भूसंपादनाची मागणी
2

Mira Bhayandar: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले; १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट, सक्तीच्या भूसंपादनाची मागणी

Cabinet Decision: मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा
3

Cabinet Decision: मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा

Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात
4

Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.