
BJP will give ticket to women for Vidhan Parishad candidature in Solapur
मुख्यमंत्र्यांच्या मते, अचानक वाढलेल्या मागणीमागे काही भागांमध्ये साठेबाजी (hoarding) होत असल्याचा संशय आहे. काही लोक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न करत असल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सरकारकडून कठोर कारवाईची तयारी सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव द्या, नाहीतर आम्ही…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी भाव साडेतीन रुपयांनी वाढवत तो 15 रुपये प्रति किलो करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदीही सुरू झाल्याचे सरकारने सांगितले.
कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून उद्या दिल्लीमध्ये केंद्र सरकारसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कांद्याच्या किमतीतील चढ-उतार, शेतकऱ्यांचे नुकसान आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरही निशाणा साधत, “आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. विरोधकांनी त्यांच्या काळात असा निर्णय घेतला होता का, ते दाखवावे,” अशी टीकाही केली.
काही विरोधक या मुद्द्यावर केवळ राजकारण करत असून फोटो ऑपॉर्च्युनिटी शोधत आहेत, अशी टीका सरकारने केली आहे. “कांदा कापल्यानंतर ज्यांच्या डोळ्यात कधी पाणी येत नाही, असे लोक आज राजकारण करत आहेत. मात्र, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून त्यांच्या हिताचेच निर्णय घेईल, अशी ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.
सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिक नेहमीपेक्षा 52 टक्के जास्तीची इंधन खरेदी करत आहेत. या अतिरेकी खरेदीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ही 52 टक्के अतिरिक्त इंधन खरेदी नेमकी कोण करतंय आणि यामध्ये कोण साठेबाजी करतंय, याचा तात्काळ शोध घेऊन पुरवठा व गृह विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
आता घरांवर सोलर लावणं झालं सोपं; महावितरणने आणली नवी योजना, वीज बिलात होणार फायदा…