
Maharashtra Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा
हवामान विभागाने आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, ठाणे, रायगड, धुळे, जळगावसह पालघर, सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. वाढत्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठी वस्ती असलेल्या 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गावांमध्ये सर्वत्र पाणी साचल असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यवतमाळ जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी आणि काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.