Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…हे टाळण्यासाठी सरकारने सुप्रीम कोर्टात जावे”; ‘अलमट्टी’ वरून राजू शेट्टींचा कर्नाटक सरकारला इशारा

‘पूर नियंत्रण, अलमट्टी पाणीपातळी, नुकसानभरपाई व नद्यांवरील पुलाचे अडथळे यांवर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र जनआंदोलन उभारेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2025 | 05:08 PM
“…हे टाळण्यासाठी सरकारने सुप्रीम कोर्टात जावे”; ‘अलमट्टी’ वरून राजू शेट्टींचा कर्नाटक सरकारला इशारा
Follow Us
Close
Follow Us:
कराड:  ‘‘कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५२४ मीटरवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह संथ होत असून, कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुराची तीव्रता वाढते.’’  कोयना धरण ते कराड हे ६८ किमी अंतर अतिशय तीव्र प्रवाहाचे असून त्यानंतर प्रवाह संथ होतो. अशा वेळी अलमट्टीची पातळी १५ ऑगस्टपर्यंत ५०९ मीटरवर ठेवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, पाण्याची फुगवटा तयार होऊन २५ – ३० दिवस पूर रेंगाळतो.’’ हे टाळण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी म्हणाले, अतिरिक्त मान्सूनपूर्व पावसामुळे यावर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. कृष्णा आणि तिच्या उपनद्यांमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, नदीप्रवाहात तयार झालेले कृत्रिम अडथळे, अयोग्य धरण व्यवस्थापन व नव्याने उभारले जाणारे पूल यांमुळे पूर रेंगाळतो आणि शेती, जनजीवन व अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर तीव्र टीका करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

राजू  शेट्टी नद्यांवरील पूल व बॅरेजच्या अडथळ्यांवर प्रकाश टाकताना म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभाग पूल बांधताना ना पर्यावरण तज्ज्ञांचा सल्ला घेते, ना जलतज्ज्ञांचे मत. फक्त ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने पूल उभे राहतात. नद्यांच्या काठावर भराव टाकले जातात. परिणामी पाण्याचा निचरा न झाल्याने पूर स्थिती तीव्र होते,’’ असा आरोपही त्यांनी केला. तसेच ‘‘हिप्परगी बॅरेजच्या भरावामुळे नदीपात्रातील पाणी वाहून न जाता तुंबते, त्यामुळे कराड व वाळवा तालुक्यांमध्ये पूर वाढतो. याशिवाय चिप्परगी (मांजरी) भागातही हेच चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले,’’

Almatti Dam: अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात शेतकरी-नागरिक आक्रमक; कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला

कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील अंकली-उमळवाड व दानोळी-सांगलीवाडी हे दोन पूल लवकरच बांधले जाणार आहेत, ‘‘हे दोन्ही पूल नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतील. परिणामी कराड, वाळवा, मिरज व शिरोळ तालुक्यांना पूराचा अधिक फटका बसेल. हे अडथळे तत्काळ दूर करणे गरजेचे आहे,’’. पूर नियंत्रणासाठी ३२०० कोटी रुपयांचा निधी जागतिक बँकेकडून घेऊन त्याचा उपयोग पूर निवारणासाठीच व्हावा. मात्र, सध्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तो निधी गटारीसारख्या कामांसाठी वापरण्याचे नियोजन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला.
कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकार पळ का काढते?
कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सरकारने आश्वासन दिले होते. मग आता ते पळ का काढताहेत? उद्योजकांची कर्जे माफ करताना कुठली समिती लावली नाही, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच नियम, अटी का हव्यात?’’ बुलेट ट्रेन व मेट्रोसाठी पैसे आहेत, मग शेतकऱ्यांसाठी का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नुकसानीच्या निकषांत बदल हवा
मान्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून पंचनामे तत्काळ व्हावेत, अशी मागणीही श्री. शेट्टी यांनी केली. ‘‘सध्या ६५ मिमी पावसावर अतिवृष्टीची नोंद होते. मात्र दोन-चार दिवस सलग तेवढाच पाऊस पडल्यास होणारे नुकसान लक्षात घेतले जात नाही. यासाठी सरकारने नुकसानीच्या निकषांमध्ये बदल करणे गरजेचे आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारला अंतिम इशारा, अन्यथा तीव्र आंदोलन

‘पूर नियंत्रण, अलमट्टी पाणीपातळी, नुकसानभरपाई व नद्यांवरील पुलाचे अडथळे यांवर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र जनआंदोलन उभारेल. सरकारने याला गभीरतेने घ्यावे. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या ऊंचीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णय; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील…

न घाबरता येणाऱ्यांना सोबत घेऊ
अलमट्टीच्या लढ्यात सांगली जिल्ह्यातील नेते जयंत पाटील व अन्य नेत्यांना बरोबर घेणार आहात का? या प्रश्नावर  शेट्टी म्हणाले, सरकारला न घाबरता आमच्याबरोबर जे येतील, त्यांना आम्ही बरोबर घेऊ. सरकार विरोधात आम्हीच तेवढे बोलतोय. मलाचं एकट्याला केवळ ज्ञान प्राप्त झाले आहे का? अशी टिप्पणी त्यांनी केली. याचा अर्थ जयंत पाटील घाबरतात, असा होतो का? या प्रतिप्रश्नावर त्यांनी “याचा तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा” अशी मुश्किल टिपण्णी केली.

Web Title: Maharashtra raju shetti warn and allegations to karnataka government about almatti dam height issue rain marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Flood situation
  • Karnataka
  • maharashtra
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
4

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.