Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; पुढील दोन आठवडे केले जाणार उपचार

आंदोलन काळात मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणस्थळी उपस्थित असणारे डॉ. चावरे यांनी त्यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. उपोषण सोडल्यानंतर जरांगेंना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं नेण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2025 | 07:44 AM

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण करण्यात आले आहे. त्यातच मागील पाच दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. मात्र, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. याचदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहे. पुढील किमान दोन आठवडे त्यांच्यावर उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे.

आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांच्या हैदराबाद गॅझेटियरसह इतर महत्वाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आंदोलन काळात मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणस्थळी उपस्थित असणारे डॉ. चावरे यांनी त्यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. उपोषण सोडल्यानंतर जरांगेंना अॅम्ब्युलन्समधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं नेण्यात येत आहे. गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे सलग चार दिवस उपोषण झाले आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधी सलग 48 तास त्यांनी प्रवास केला. त्यामुळे उपोषण सहा दिवसांचं झालेलं आहे. याच उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.

बीपीसह शुगर लेव्हलही झाली कमी

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. सध्या त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासली आहे. त्यामध्ये त्यांची ही पातळी कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यांना अशक्तपणाही जास्त प्रमाणात आहे. यानंतर त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येत आहे. त्यानंतर किमान दोन आठवडे संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार केले जातील. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

राज्य सरकारने काढला जीआर

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान आपण आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत असे, जरांगे पाटील यांनी घोषणा केली आहे. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोकांना पण आरक्षण मिळेल असे जरांगे पाटील म्हणाले.

Close

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण करण्यात आले आहे. त्यातच मागील पाच दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. मात्र, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. याचदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहे. पुढील किमान दोन आठवडे त्यांच्यावर उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे.

आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांच्या हैदराबाद गॅझेटियरसह इतर महत्वाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आंदोलन काळात मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणस्थळी उपस्थित असणारे डॉ. चावरे यांनी त्यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. उपोषण सोडल्यानंतर जरांगेंना अॅम्ब्युलन्समधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं नेण्यात येत आहे. गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे सलग चार दिवस उपोषण झाले आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधी सलग 48 तास त्यांनी प्रवास केला. त्यामुळे उपोषण सहा दिवसांचं झालेलं आहे. याच उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.

बीपीसह शुगर लेव्हलही झाली कमी

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. सध्या त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासली आहे. त्यामध्ये त्यांची ही पातळी कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यांना अशक्तपणाही जास्त प्रमाणात आहे. यानंतर त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येत आहे. त्यानंतर किमान दोन आठवडे संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार केले जातील. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

राज्य सरकारने काढला जीआर

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान आपण आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत असे, जरांगे पाटील यांनी घोषणा केली आहे. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोकांना पण आरक्षण मिळेल असे जरांगे पाटील म्हणाले.

Web Title: Manoj jarange health deteriorated after hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 07:44 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर
1

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही
2

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या
3

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

Sangali News : “…अन्यथा आंदोलन करु”; उद्यानाच्या दुरावस्थेवर सांगलीकरांचा संताप
4

Sangali News : “…अन्यथा आंदोलन करु”; उद्यानाच्या दुरावस्थेवर सांगलीकरांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.