Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander: पुलाचं काम पूर्ण होऊनही लोकार्पण नाही,काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा

स्थानिक राजकीय नेत्यांनी हा पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, असा आग्रह धरल्याचे समजते. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे वेळ मागण्यात आली असून, अद्याप वेळ मिळालेली नाही, असं सांगण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2025 | 03:50 PM
Mira Bhayander: पुलाचं काम पूर्ण होऊनही लोकार्पण नाही,काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते  : शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मेट्रो समांतर पुलांचे काम वेगाने पूर्ण होत असले तरी त्याच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यानचा पूल पूर्ण होऊनही अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी तीन पूल उभारण्याचा निर्णय

मिरा-भाईंदरमध्ये प्रवेशासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल्डन नेस्ट हा मुख्य मार्ग आहे, आणि यालाच अनेक पर्यायी रस्ते जोडलेले आहेत. परिणामी, या चौकांमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मेट्रो मार्गाला समांतर तीन पूल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. यातील प्लेझंट पार्क ते सिल्वर पार्क सिग्नल दरम्यानचा पहिला पूल काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता साईबाबा नगर ते शिवार गार्डन पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यास उशीर होत असल्याने रहिवाशांत प्रचंड असंतोष आहे.

विधानसभा निवडणुकीला निलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले…; शिवसैनिकाचा गंभीर आरोप

उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीचा आग्रह?

स्थानिक राजकीय नेत्यांनी हा पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, असा आग्रह धरल्याचे समजते. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे वेळ मागण्यात आली असून, अद्याप वेळ मिळालेली नाही. त्यामुळे पुलाचे लोकार्पण रखडले असून, वाहतुकीसाठी खुला करण्यास उशीर होत आहे.

काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा

या प्रकरणी मिरा-भाईंदर काँग्रेस आक्रमक झाली आहे. युवक काँग्रेसचे सिद्धेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुलाजवळ आंदोलन केले. “नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पुलाचे त्वरित उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करावा,” अशी काँग्रेसने मागणी केली आहे.”मुख्यमंत्र्यांच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी नागरिकांच्या सोयीचा विचार करा. वाहतूककोंडीमुळे शेकडो लोकांना रोज अडथळे येत आहेत. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन पूल उघडावा, अन्यथा काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

Raigad News: पाली ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार? पाणीसाठा वाढवण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरु

या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी पुलाची पाहणी केली होती. त्यांनी हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, पुलाचे काम पूर्ण होऊनही नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.वाहतूककोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी हा पूल तातडीने खुला करण्याची मागणी केली आहे.”राजकीय नफा-तोट्याच्या गणितात नागरिकांच्या त्रासाचा विचार व्हावा. पूल तयार झाला आहे, मग उशीर कशासाठी? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच्या अटीपेक्षा जनतेच्या सोयीला प्राधान्य दिले पाहिजे,” असे स्थानिक रहिवासी सांगत आहेत.मेट्रो समांतर पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास मिरा-भाईंदरच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन हा पूल लोकांसाठी खुला करावा, अन्यथा वाढती वाहतूककोंडी आणि नागरिकांचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Mira bhayander even after the completion of the bridge work there is no dedication aggressive posture of congress warning of agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Devendra Fadanis
  • Mahayuti
  • mira bhayandar
  • NCP Politics

संबंधित बातम्या

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
1

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन
2

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

नागपूर महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी; मध्यरात्री तीन वाजता अनिल देशमुखांचा फोन अन्…
3

नागपूर महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी; मध्यरात्री तीन वाजता अनिल देशमुखांचा फोन अन्…

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा
4

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.