5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातलं असून नदी नाल्यांना मे महिन्यातच वाहू लागले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या २ दिवसात केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनची अशीच प्रगती सुरू राहिली तर १ जून पर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो, मात्र यंदा तब्बल 8 दिवस आधीच दाखल होणार आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरुच; हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच मान्सूनच्या प्रगतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून दक्षिण अरबी समुद्रात आणखी प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमधील काही भागात धडक देईल.
Rain Alert : सावधान! पुढचे 6 ते 7 दिवस तुफान पाऊस पडणार, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोका
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर ७ दिवसात महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये वेळेआधी दाखल होणार आहे. त्यामुळे राज्यातही लवकर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबार, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, गडचिरोली, जालना, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.