Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: “गल्लीत बसून जे बरळत आहेत…”; श्रीकांत शिंदेंचे ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर

Shrikant Shinde: भारताच्या शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगभरातील देशांचा दौरा केला होता. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2025 | 08:27 PM
Operation Sindoor: "गल्लीत बसून जे बरळत आहेत..."; श्रीकांत शिंदेंचे ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर

Operation Sindoor: "गल्लीत बसून जे बरळत आहेत..."; श्रीकांत शिंदेंचे ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: आज मुंबईच्या वरळी येथे शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा पर पडला. या सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. नुकताच भारताच्या शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगभरातील देशांचा दौरा केला होता. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. टीका करणाऱ्याना देखील त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जगभरातील देशांना पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्याबद्दल आणि भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेले सडेतोड प्रत्युत्तर याबाबत माहिती देण्याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य सदस्यांची होती. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “हे शिष्टमंडळ तयार झाले तेव्हा यामध्ये अनेक अनुभवी लोक होते. अनुभवी लोकांमध्ये एका तरुण चेहऱ्याला संधी देणे, त्यांना पुढे आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.”

तुम्ही जगभरात ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी गेले असता, तुम्हाला साधे कुणी भेटायला देखील आले नाही, अशी टीका भारतातील काही राजकारणी मंडळींनी केली. त्याबाबत प्रश्न विचारला असता, खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “इथे बसून कोणाला टीका करायची आहे त्यांनी ती टीका केलेली आहे. मात्र भारताला, 140 कोटी देशवासियांना जो संदेश जगाला द्यायचा होता, ते काम आम्ही केले आहे. जे लोक गल्लीमध्ये बसून बरळत आहेत त्यांना, बरळूद्या. आम्हाला जे काय करायचे होते ते आम्ही करून आलो आहे.”

“जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी हल्ले बंद करणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. जर पाकिस्तानने पुन्हा भारतावर दशतवाडी हल्ले केले तर भारत असेच चोख प्रत्युत्तर देईल, हे आम्ही जगाला सांगितले आहे,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.  

Web Title: Mp shrikant shinde statement operation sindoor delgations shivsena vardhapan din mumbai politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • shivsena

संबंधित बातम्या

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
1

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
2

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
3

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
4

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.